Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Suryakumar Yadav T20 Captaincy Controversy: टी20 फॉरमॅटमधून सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन बाजूला करुन, त्याच्या जागी मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे.
Suryakumar Yadav T20 Captaincy Controversy
Suryakumar YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Suryakumar Yadav T20 Captaincy Controversy: टी20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाने आतापासूनच 2028 मध्ये होणाऱ्या पुढील विश्वचषकासाठीची तयारी सुरु केली. या दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) संघात काही मोठे आणि धक्कादायक बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या वृत्तसंकेतांनुसार, टी20 फॉरमॅटमधून सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन बाजूला करुन, त्याच्या जागी मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे. मात्र, बीसीसीआयच्या (BCCI) या संभाव्य निर्णयावर भारतीय संघाच्या पूर्व मुख्य निवडकर्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, सूर्याला अशा प्रकारे अचानक कर्णधारपदावरुन हटवणे अत्यंत चुकीचे पाऊल ठरेल, असा इशारा दिला.

Suryakumar Yadav T20 Captaincy Controversy
Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

पूर्व मुख्य निवडकर्त्यांनी एका विशेष मुलाखतीत या वादावर आपले स्पष्ट मत मांडताना अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आगामी दौऱ्यासाठी तुम्ही तुमचा मुख्य संघ पाठवत आहात की दुय्यम संघ? जर मुख्य संघ खेळणार असेल, तर सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूला कर्णधारपदावरुन हटवणे योग्य होणार नाही. सूर्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या नेतृत्वाखाली नुकताच भारताला टी20 विश्वचषक जिंकून दिला.

जर भविष्यासाठी नवीन कर्णधार तयार करायचा असेल, तर पुढील पाच-सहा महिन्यांत योग्य प्रक्रिया राबवून कोणाला तरी तयार केले पाहिजे. सध्या अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद आहे, त्यामुळे त्याच्या नावाचाही विचार होऊ शकला असता किंवा एखाद्या तरुण खेळाडूला सूर्याचा उपकर्णधार बनवून त्याच्या हाताखाली तयार करणे अधिक फायद्याचे ठरले असते.

Suryakumar Yadav T20 Captaincy Controversy
Team India New Coach: गोव्याचा सुपुत्र आता टीम इंडियाचा 'बॉस'! महेश गवळी यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

दुसरीकडे, श्रेयस अय्यर व्यतिरिक्त कर्णधारपदाच्या इतर शर्यतीबाबत विचारले असता, पूर्व मुख्य निवडकर्त्यांनी हार्दिक पांड्या हा या पदासाठी सर्वात मजबूत दावेदार असल्याचे सांगितले. त्याखालोखाल श्रेयस अय्यर, ईशान किशन, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन हे देखील कप्तानीच्या शर्यतीत आणि रांगेत उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Suryakumar Yadav T20 Captaincy Controversy
Team India Qualification Scenario: सेमीफायनलच्या शर्यतीत ट्विस्ट! आफ्रिकेचा सामना ठरणार टर्निंग पॉइंट; टीम इंडियाचं भवितव्य अधांतरी

सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) कर्णधारपदावरुन हटवण्याच्या या अंतर्गत हालचालींमागे त्याचा वैयक्तिक फॉर्म हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. टी20 विश्वचषकात भारताने विजेतेपद मिळवले असले, तरी सूर्याची बॅट संपूर्ण स्पर्धेत शांत राहिली होती. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या हंगामात त्याला फॉर्ममध्ये परतण्याची उत्तम संधी होती, परंतु खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. एकीकडे सूर्या धावा काढण्यासाठी संघर्ष करत असतानाच, संघातील इतर तरुण खेळाडूंनी दमदार कामगिरी करुन संघात आपले स्थान आणि दावा अधिक मजबूत केला. यामुळेच आता श्रेयस अय्यरच्या रुपाने टीम इंडियाला नवीन टी20 कर्णधार मिळण्याची शक्यता बळावली.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com