SL vs IRE: प्रभात जयसूर्या इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, वर्ल्ड रेकॉर्डपासून अवघे एक पाऊल दूर

Prabath Jayasuriya: श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत ही लढत रोमांचक वळणावर पोहोचली आहे.
Prabath Jayasuriya
Prabath JayasuriyaDainik Gomantak

Prabath Jayasuriya: श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत ही लढत रोमांचक वळणावर पोहोचली आहे.

गाले येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या दोन फलंदाजांनी द्विशतक शतके झळकावून इतिहास रचला, तर फिरकीपटू प्रभात जयसूर्याही मोठा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने आतापर्यंत 1 बळी घेतला आहे. आता आणखी एक बळी घेतल्यास तो सर्वात जलद 50 कसोटी विकेट्स घेणारा जगातील नंबर 1 स्पिनर बनेल.

यासह, श्रीलंकेचा डावखुरा गोलंदाज कमीत कमी सामन्यांमध्ये 50 कसोटी बळींचा टप्पा गाठणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे.

आतापर्यंत 49 बळी घेतले आहेत

जयसूर्याने श्रीलंकेतील (Sri Lanka) दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 174 धावांत 5 गडी बाद केले. सातव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विकेट घेत त्याने कारकिर्दीत आतापर्यंत 49 बळी घेतले आहेत.

तर दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकीपटू अल्फ व्हॅलेंटाईन सध्या आठ कसोटीत 50 बळी घेऊन अव्वल फिरकी गोलंदाज आहे, पण जयसूर्या आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात आणखी दोन बळी घेऊन 71 वर्षांचा जुना विक्रम मोडू शकतो.

Prabath Jayasuriya
SL vs IRE: श्रीलंकेच्या जादुई फिरकीपटूने पुन्हा घेतले 5 बळी, कसोटी इतिहासात नोंदवले गेले नाव

7 सामन्यात 50 बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनू शकतो

जयसूर्याने आणखी 1 बळी घेतल्यास, तो दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज व्हर्नन फिलँडर आणि इंग्लंडचा गोलंदाज टॉम रिचर्डसन यांच्यासह 7 सामन्यांमध्ये 50 बळींचा टप्पा गाठणारा तिसरा गोलंदाज बनेल.

फिलँडरने नोव्हेंबर 2011 मध्ये आपल्या 7व्या कसोटीत 50 विकेट्स घेतल्या, तर रिचर्डसनने 7 कसोटीत 50 विकेट्स घेतल्या, परंतु 1896 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याला हा पराक्रम साध्य करण्यासाठी जवळपास तीन वर्षे लागली. प्रभातने गेल्या वर्षी जुलैमध्ये कसोटी पदार्पण केले.

Prabath Jayasuriya
BAN vs IRE: तैजुल इस्लामने केला विश्वविक्रम, असा पराक्रम करणारा ठरला जगातील एकमेव गोलंदाज

चार्ली टर्नरच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज चार्ली टर्नरच्या नावावर आहे.

त्याने 1888 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सहाव्या कसोटी सामन्यात 50 कसोटी बळी घेण्याचा विक्रम केला. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आयर्लंडने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 54 धावा केल्या आहेत.

158 धावांनी पिछाडीवर आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेने शानदार फलंदाजी करताना 3 गडी गमावून 704 धावा करुन डाव घोषित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com