Ranji Trophy: शार्दुलनं आक्रमक शतकासह, तर साई किशोरने 5 विकेट्सह विक्रम करत लुटली मैफल, पाहा Video

Shardul Thakur Century and Sai Kishore 5 wickets: रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात शार्दुल ठाकूरने शतक ठोकले, तर साई किशोरने 5 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले.
Shardul Thakur Century | Sai Kishore 5 wickets Haul
Shardul Thakur Century | Sai Kishore 5 wickets HaulX/BCCIDomestic

Shardul Thakur Century and Sai Kishore 5 wickets haul Video

रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असून पासून शनिवारपासून (2 मार्च) उपांत्य फेरीला सुरुवात झाली आहे. या उपांत्य फेरीतील मुंबई विरुद्ध तमिळनाडू या सामन्यात दुसऱ्या दिवशी दोन खेळाडूंनी आपल्या कामिगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले. हे दोन खेळाडू म्हणजे शार्दुल ठाकूर आणि आर साई किशोर.

2 मार्चपासून सुरू झालेल्या या सामन्यात तमिळनाडूचा पहिला डाव अवघ्या 146 धावांमध्ये संपला. त्यानंतर मुंबईचा संघ फलंदाजीला उतरला. यावेळी मुंबईला सुरुवातीला तमिळनाडूचा कर्णधार आर साई किशोरने मोठे धक्के दिले.

कुलदीप सेनने पृथ्वी शॉ याला 5 धावांवरच बाद केल्यानंतर साई किशोरच्या गोलंदाजीसमोर मुंबईची वरची आणि मधली फळी संघर्ष करताना दिसली.

Shardul Thakur Century | Sai Kishore 5 wickets Haul
Ranji Trophy: मुंबईच्या पठ्ठ्यांचा पराक्रम! 10 अन् 11 व्या क्रमांकावर शतकं ठोकत 78 वर्षे जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती

साई किशोरने सलामीवीर भुपेन लवानी, नाईट वॉचमन मोहित अवस्थी, कर्णधार अजिंक्य रहाणे, हार्दिक तामोरे आणि मुशीर खान या प्रमुख फलंदाजांना बाद करत 5 विकेट्सही पूर्ण केल्या. त्याने नंतर अष्टपैलू शम्स मुलानीलाही त्रिफळाचीत केले.

याबरोबरच त्याने यंदाच्या रणजी हंगामात 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो एकाच रणजी हंगामात 50 हून अधिक विकेट्स घेणारा तमिळनाडूचा तिसराच गोलंदाज ठरला. यापूर्वी तमिळनाडूकडून एस वेंकटराघवन (1972-73) आणि आशिष कपूर (1999-00) यांनी एका रणजी हंगामात 50 विकेट्चा टप्पा गाठला होता.

Shardul Thakur Century | Sai Kishore 5 wickets Haul
Shardul Thakur: नॉर्मल माणूस वाटला का? लॉर्ड शार्दूलने मिळवलंय थेट डॉन ब्रॅडमनच्या पंक्तीत स्थान

दरम्यान, साई किशोरच्या गोलंदाजीमुळे मुंबई संघ अडचणीत सापडला होता. मुंबईने 106 धावांवरच 7 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या शार्दुल ठाकूरने आक्रमक खेळताना डाव सावरण्याबरोबरच मुंबईला आघाडीही मिळवून दिली.

त्याने हार्दिक तामोरेबरोबर 100 धावांची, तर तनुष कोटीयनबरोबर 79 धावांची भागीदारी करताना त्याचे शतकही पूर्ण केले.

शार्दुलने 89 चेंडूत शतक केले. त्याने डावातील 81 व्या षटकात अजित रामच्या गोलंदाजीवर लाँग-ऑफला तो शतकानंतर 109 धावांवर बाद झाला. 104 चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने 13 चौकार आणि 4 षटकार मारले. हे शार्दुलचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले.

दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मुंबईचा पहिला 106.5 षटकात 378 धावांवर संपला. त्यामुळे मुंबईला 232 धावांची आघाडी मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com