World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया फायनल खेळणार, पण मार्शने IPL दरम्यान केलेली 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

Mitchell Marsh: वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार असल्याने मिचेल मार्शने आयपीएलदरम्यान केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे.
India vs Australia
India vs AustraliaBCCI
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia Final, Mitchell Marsh Prediction:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील दोन अंतिम संघ मिळाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात अंतिम सामना होणार असल्याने 6 महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शने केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे.

32 वर्षीय मार्शने आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान मे महिन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना भविष्यवाणी केली होती की भारत आणि ऑस्ट्रेलिया हे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यात खेळतील. तसेच त्याने कोणता संघ किती धावांनी जिंकेल, हेही सांगितले होते.

India vs Australia
World Cup 2023: विराट, श्रेयस अन् शमी..., टीम इंडिया 12 वर्षांनी फायनलमध्ये पोहण्याची 5 कारणे

त्याने म्हटले होते की ऑस्ट्रेलिया तब्बल 385 धावांनी सामना जिंकेल. तो दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टमध्ये म्हटला होता की 'ऑस्ट्रेलिया अपराजित राहिल आणि भारताला अंतिम सामन्यात पराभूत करेल. ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात 2 बाद 450 धावा करेल आणि भारताला 65 धावात सर्वबाद करेल.'

दरम्यान, आता त्याने सांगितलेल्या त्याच्या अंदाजानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामना तर खेळणार आहेत, पण आता त्याने धावांबद्दल केलेला अंदाज खरा ठरणार का, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी मार्श वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून चांगली कामगिरीही केली आहे. त्याने 9 सामन्यांत 53.25 च्या सरासरीने 426 धावा केल्या आहेत.

India vs Australia
AUS vs SA: वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार! दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्सनी पराभव

भारत आणि ऑस्ट्रेलियाची कामगिरी

उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडला, तर ऑस्ट्र्लियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित राहिला आहे. भारताने 10 पैकी 10 सामने जिंकले आहेत, तसेच ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील पहिले दोन सामने पराभूत झाल्यानंतर पुढील सर्व 8 सामन्यात विजय मिळवला आहे.

दरम्यान, भारतीय संघ 19 नोव्हेंबरला चौथ्यांदा, तर ऑस्ट्रेलिया आठव्यांदा वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे. तसेच 2003 नंतर 20 वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com