ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Reasons Behind Team India T20 Loss: टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात अत्यंत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
Reasons Behind Team India T20 Loss
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Team India Defeat Against England T20 2026: टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात अत्यंत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाकडून कर्णधार श्रेयस अय्यरचा अपवाद वगळता इतर एकही खेळाडू मैदानावर टिकू शकला नाही किंवा प्रभावी कामगिरी करु शकला नाही. नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 158 धावांचे आव्हान दिले होते.

भारताने (India) दिलेले हे माफक आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांनी केवळ 13.5 षटकांतच पूर्ण करत टीम इंडियाला पराभवाची धूळ चारली. भारताच्या या मानहानिकारक पराभवानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट जगतातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या पराभवाचे हे 5 खेळाडू मुख्य 'व्हिलन' ठरले.

Reasons Behind Team India T20 Loss
ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

या पराभवाचा पहिला मोठा व्हिलन म्हणजे वॉशिंग्टन सुंदर. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत सुंदर आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. संघाला त्याच्याकडून फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मोठ्या अपेक्षा होत्या; परंतु त्याने घोर निराशा केली. फलंदाजीत तो अवघ्या 5 धावा करुन बाद झाला, तर गोलंदाजी करताना त्याने टाकलेल्या एकमेव षटकात तब्बल 19 धावा दिल्या. तसेच, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन हा दुसरा व्हिलन ठरला.

Reasons Behind Team India T20 Loss
ENG vs IND: "जेव्हा संघ बदलतो, तेव्हा असं होतं..."! टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर गंभीरनं स्पष्टच सांगितलं; बुमराह-हार्दिकचं नाव घेत केला बचाव

आयपीएल संपल्यापासून ईशानचा फॉर्म पार घसरला असून त्याची बॅट पूर्णपणे शांत आहे. या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. या महत्त्वपूर्ण सामन्यात तो 6 चेंडूत अवघ्या 4 धावा करुन तंबूत परतला. यापूर्वी आयर्लंड दौऱ्यावरही त्याला दोन सामन्यांत फक्त 13 धावा करता आल्या.

Reasons Behind Team India T20 Loss
IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

संघाचा माजी उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा तिसरा व्हिलन ठरला. या मालिकेत त्याची कामगिरी अतिशय सुमार दर्जाची झाली. चौथ्या टी-20 सामन्यात फलंदाजी करताना त्याने 2 चेंडूत 1 धाव केली, तर गोलंदाजीत 2 षटकांत 24 धावा देऊन तो एकही बळी घेऊ शकला नाही. भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा प्रसिद्ध कृष्णा हा चौथा व्हिलन ठरला. त्याच्या गोलंदाजीत ना कोणती लय दिसत होती ना अचूक टप्पा. त्याने 3 षटकांत 26 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही.

Reasons Behind Team India T20 Loss
IND vs ENG Pitch Report: "वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?" ओपनर्सचा धमाका की स्विंगचा तडाखा; हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये टॉस ठरणार गेम चेंजर

पाचवा आणि अखेरचा व्हिलन ठरला अष्टपैलू शिवम दुबे. अलिकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दुबेकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, या सामन्यात त्याने गोलंदाजीत एका षटकात 15 धावा दिल्या, तर फलंदाजीत 23 चेंडू खर्ची घालत संथ गतीने केवळ 22 धावा केल्या. या पाचही प्रमुख खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताला हा सामना गमवावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com