
जेव्हा एखाद्या व्यक्तीची किडनी नीट काम करणे थांबवते तेव्हा डॉक्टर डायलिसिसचा सल्ला देतात. डायलिसिस ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मशीनच्या मदतीने शरीरातील घाण आणि अतिरिक्त पाणी काढून टाकले जाते, जे सामान्यतः किडनीद्वारे केले जाते. परंतु अनेकांना असा प्रश्न पडतो की, डायलिसिसद्वारे हे काम करता येत असेल तर किडनी ट्रांसप्लांटची का गरज भासते? चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...
पहिली गोष्ट म्हणजे डायलिसिस हा किडनीच्या आजारावरचा इलाज नाही तर तात्पुरता उपाय आहे. याचा अर्थ असा की, डायलिसिस किडनीची कायमची जागा घेत नाही. रुग्णाला आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा डायलिसिस सेंटरमध्ये जावे लागते. रुग्णासाठी ही प्रक्रिया थकवणारी असते. हळूहळू त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो.
जेव्हा एखाद्याची किडनी पूर्णपणे खराब होते आणि तो बराच काळ डायलिसिसवर असतो, तेव्हा डॉक्टर (Doctor) ट्रांसप्लांटचा सल्ला देतात. ट्रांसप्लांट म्हणजे दुसऱ्याची निरोगी किडनी रुग्णाच्या शरीरात बसवणे. जर शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली तर ही नवीन किडनी पुन्हा शरीरातील सर्व विषारी घटक आणि अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास सुरुवात करते. यामुळे व्यक्ती दैनंदिन दिनचर्या सामान्यपणे जगू शकतो. दररोज रुग्णालयात जाण्याची गरज भासत नाही. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारतात आणि शरीरात शक्ती परत येते. ट्रांसप्लांटनंतर बरेच लोक पुन्हा काम करण्यास किंवा अभ्यास करण्यास सुरुवात करतात.
तथापि, ट्रांसप्लांट करणे प्रत्येकासाठी सोपे नाही. सर्वप्रथम, जुळणारा दाता शोधणे हे एक मोठे आव्हान आहे. ट्रांसप्लांटनंतर, शरीर नवीन किडनी स्वीकारेल आणि ते नाकारु नये म्हणून काही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. परंतु यादरम्यान काही रुग्णांची प्रकृती खूप खलावते होते. म्हणूनच, डायलिसिस सुरु झाल्यापासून डॉक्टर रुग्ण ट्रांसप्लांटसाठी तयार आहे की नाही याचे मूल्यांकन करतात. जर हो, असेल तर ट्रांसप्लांटची प्रक्रिया सुरु करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.