टी-२० विश्वचषक
भारताने २०२५ च्या महिला १९ वर्षांखालील टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने पराभव करून टीम इंडियाने इतिहास रचला.
बक्षीस रकमेची घोषणा
बीसीसीआयने महिला अंडर-१९ क्रिकेट संघासाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. हा विजय भारतीय संघासाठीही खास होता कारण संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारत एकही सामना हरला नाही.
५ कोटी रुपयांचे बक्षीस
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारताच्या विजेत्या संघासाठी ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहेत. संघातील सर्व १५ खेळाडू, मुख्य प्रशिक्षक नूशीन अल खादीर आणि उर्वरित सपोर्ट स्टाफमध्ये हे बक्षीस वितरित केले जाणार आहे.
भारतीस संघाचं स्वागत
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे म्हणाले की, "अंडर १९ महिला विश्वचषक राखल्याबद्दल आमच्या मुलींचे अभिनंदन. ही एक अनुकरणीय मोहीम आहे ज्यामध्ये त्या संपूर्णपणे अपराजित राहिल्या, असं म्हणत त्यांनी भारतीस संघाचं स्वागत केलं आहे.
निक्की प्रसाद
निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीस संघाने स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेचा शेवटही विजयाने केला. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये टीम इंडिया चॅम्पियन टीमप्रमाणे खेळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.