Tillari Dam : तिलारीतून विसर्ग सुरु; उत्तर गोव्याला पूराचा धोका नाही

जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी याबाबतची माहिती दिली.
Tillari Dam
Tillari DamDainik Gomantak
Published on
Updated on

सतत सुरु असलेल्या पावसामुळे तिलारी धरणाचा पाणीसाठी इशारा पातळीजवळ पोचल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसे असले तरी उत्तर गोव्यात पुराची भीती नाही आहे. गोव्यात जेव्हा भरतीची वेळ असते तेव्हा तिलारीचे पाणी सोडले जात नाही अशी माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

Tillari Dam
Dudhsagar Waterfall: दूधसागर परिसरात शुकशुकाट; 'त्या' व्हायरल व्हिडिओची पर्यटकांमध्ये दहशत

शनिवारी तिलारी धरणातील पाणी साठ्याने सांडवा पातळी गाठल्याने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. तो विसर्ग कमी प्रमाणात होता. मात्र, सोमवारी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली.

दरम्यान, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने संबंधित नदीकाठच्या गावांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. उत्तर गोव्याला पुराचा धोका नसल्याची माहिती गोवा जलस्त्रोत खात्याकडून देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com