

मोरजी: पाण्याची बिले चार-पाच महिन्यांची एकत्रित येत असल्यामुळे सामान्य ग्राहकांना ती एकाच वेळी भरता येणार नाहीत. रोजंदारीवर कामासाठी जाणारे ग्राहक एकदम चार-पाच महिन्यांचे चार ते पाच हजार रुपयांचे एकत्रित बिल आले तर ते कसे भरणार, असा सवाल तुयेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच नीलेश कांदोळकर यांनी उपस्थित केला.
तुये पंचायत क्षेत्रातील काही ग्राहकांना पाण्याची बिले चार ते पाच महिन्यांची एकत्रित दिल्यामुळे ग्राहकांत नाराजी पसरली आहे. माजी सरपंच नीलेश कांदोळकर यांनी पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. नीलेश कांदोळकर यांनी सांगितले, की तुये पंचायत क्षेत्रात चार ते पाच महिन्याची एकत्रित बिले आल्यामुळे लोकांची धांदल उडालेली आहे.
एकाच वेळी जे रोजंदारीवर कामाला जातात. त्यांना भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारने उपाययोजना करून यापुढे नियमित दर महिन्याला बिले द्यावीत, अशी मागणी केली. पाणी ग्राहकाला जी चार-पाच महिन्यांची बिले एकत्रित आलेली आहेत, त्यांना तीन हप्त्यांमध्ये ते बिल पाणी विभागाकडे भरता येते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पाणी विभागाचे काही कर्मचारी जे मीटर रीडर असतात त्यांना सरकारने निवडणूक कामे इतर कामासाठी घरोघरी पाठवले जाते. किंवा इतर अहवाल तपशील देण्याचे हे काम त्यांच्याकडे सुपूर्द केले जाते. म्हणून दर महिन्याला बिले देताना पाणी विभाग खात्याला अडचणी येत आहे, अशी कैफियत अधिकाऱ्यांनी यावेळी मांडली. यापुढे नियमित दर महिन्याचे बिल दिले जाईल, असे अधिकारी मेल्टन यांनी सांगितले.
पाणी ग्राहक हरमलकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना आपल्याला सुरुवाती २६०, ३०० रुपये दर महिन्याला बिल यायचे. परंतु आज चार महिन्याचे बिल तब्बल ४ हजार रुपयांपेक्षा जास्त कसे काय ?असा सवाल करून हे बिल भरणे ही परवडणार नाही. महिन्याला तीनशेच्या आसपास येणारे बिल पाच महिन्यांला एवढे कसे काय आले? असा सवाल हरमलकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.