
डिचोली: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या यात्रेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीला पूर्णपणे काही धोंडगण जबाबदार आहेत. असे वक्तव्य लईराई देवस्थानचे अध्यक्ष दिनानाथ गावकर म्हणाले. यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, ५० जण जखमी झाले आहे. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष गावकर बोलत होते. चेंगराचेंगरीच्या घटनेला पूर्णपणे काही धोंडगण जबाबदार असल्याचे गावकर म्हणाले.
या घटनेसाठी प्रशासन किंवा देवस्थान समितीला दोष देणे चुकीचे आहे. धोंडगणांच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचे गावकर यांनी नमूद केले. यावेळी मुख्यमंत्री सावंत देखील हजर होते.
चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. तसेच, जखमींवर योग्य पद्धतीने उपचार होतील यासाठी काळजी घेतली जात असल्याचे सावंत म्हणाले. चेंगराचेंगरी सारखी दुर्दैवी घटना यापुढे घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.
या घटनेतील जखमींवर योग्य पद्धतीने उपचार सुरु असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. उपचारासाठी कोणतीही हयगय होणार नाही, गरज भासल्यास बाहेरुन डॉक्टर मागवू, असे मंत्री राणे म्हणाले. चेंगराचेंगरीतील पाच जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांनी दिली आहे.
दरम्यान, शिरगावातील घटना प्रशासनाचे अपयश असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. मृतांच्या कृटुंबियांना सरकारने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देखील सरदेसाई यांनी केली आहे. दुसरीकडे कौल प्रसादाच्या विधीला धोंड आणि भाविकांना अधिक गर्दी न करण्याचे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.