‘धर्माच्या नावाखाली भाजपचे राजकारण’

रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे सर्वेसर्वा मनोज परब यांची घणाघाती टीका
Revolutionary Goans Manoj Parab
Revolutionary Goans Manoj ParabDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात धर्मांतरणविरोधी कायदा आणण्याचा इशारा देऊन भाजप सरकार धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. त्यांनी हा कायदा आणण्यापूर्वी त्याचे स्वरूप कशा प्रकारचे असेल, हे अगोदर स्पष्ट करायला हवे. त्यानंतर त्याचा उल्लेख करण्याची गरज आहे, असे मत रिव्होल्युशनरी गोवन्सचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी व्यक्त केले.

राज्यातील परप्रांतीय हे बऱ्याचदा धर्मांतरण करण्याकडे वळतात. हे परप्रांतीय भाजप सरकार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. धर्मांतरण केलेल्यांची त्यांचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपचा त्यामागील हा छुपा एजंडा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. धर्मांतरण करणे योग्य नाही. प्रत्येक धर्माबरोबर अनेकांच्या भावना जुळलेल्या असतात. त्याला लोकांनी धर्मांतरण करून तडा जाऊ देऊ नये. कोणाचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करण्यात येऊ नये, असे परब म्हणाले.

Revolutionary Goans Manoj Parab
कोलवाळ कारागृहातील कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी बदली

पोर्तुगीज काळात धर्मांतर करताना मंदिरे पाडण्यात आली. ही मंदिरे पुन्हा बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, हे सरकार विविध प्रकल्पांसाठी लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहे, ज्या ठिकाणी त्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून देवस्थाने, धर्मस्थळे आहेत.

मोपा विमानतळासाठी लाखो चौरस किलोमीटर जागा ताब्यात घेण्यात आली. मात्र, त्यावेळी तेथील लोकांच्या जमिनीत असलेल्या धार्मिक स्थळांचा विचार केला गेला नाही, अशी टीका रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांनी यावेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com