Tillari Canal: ‘तिळारी’चे भगदाड बुजवणे आजपासून सुरू; गोव्याकडे पुरेसा पाणीसाठा

Tillari Dam: कालव्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी गोवा सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत
Tillari Dam: कालव्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी गोवा सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत
Tilari Canal Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तिळारी कालव्याला पडलेले भगदाड मोठे नाही. ते बुजवण्याचे काम उद्या, सोमवारी हाती घेतले जाणार आहे. पावसाळा असल्याने पाण्याची मागणी मोठी नाही, तरीही गोव्याकडे पुरेसा पाणीसाठा आहे. आमठणेतून अस्नोडा प्रकल्पात पाणी सोडले जात आहे, अशी माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

तिळारी कालव्याला धनगरवाडी-कुडासे (दोडामार्ग-महाराष्ट्र) येथे भगदाड पडल्याची घटना शनिवारी घडली. त्यामुळे कालव्यातून होणारा पाणी पुरवठा तत्काळ बंद करावा लागला, त्यामुळे गोव्यात येणारे पाणी बंद झाले होते. कालव्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी गोवा सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. कालवा फुटल्याने गोव्यात येणारे पाणी बंद झाले असल्याने त्याचा परिणाम येथील काही तालुक्यावर होईल, असे वाटत होते.

Tillari Dam: कालव्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी गोवा सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत
Tillari Dam: अखेर 50 दिवसानंतर तिळारीतून आले गोव्यासाठी पाणी; पर्वरी, साळगावची तहान भागणार

पावसाळा असल्याने पाणी बंदचा फारसा परिणाम होणार नाही, असे मंत्र्यांचे म्हणणे आहे. आमठणे धरणातून अस्नोडा प्रकल्पात पाणी सोडण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उद्‍भवणार नाही. परंतु तरीही उद्या, सोमवारी दुपारी सर्व अभियंत्यांना घेऊन तिळारी कालवा फुटीविषयी आढावा घेऊन पावले उचलली जातील, असे शिरोडकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com