
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्धच्या आशियाई करंडकातील ‘सुपर-४’ लढतीत ३९ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी साकारणाऱ्या भारताच्या अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर चोहोबाजूंनी कौतुक करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने अभिषेकचे स्तुती करताना म्हटले की, अभिषेक हा सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमधील भारताचा सर्वोत्तम खेळाडू आहे. युवराजने सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय व टी-२० क्रिकेट गाजवले. अगदी त्याचप्रमाणे अभिषेकमध्येही या दोन्ही प्रकारात चमक दाखवण्याची क्षमता आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या आशियाई क्रिकेट करंडकात सलग चार सामन्यांमध्ये विजय संपादन करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ‘सुपर फोर’ फेरीमधील पहिल्या लढतीत पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियाला बांगलादेशशी दोन हात करावयाचे आहेत.
या लढतीत विजय मिळवल्यास भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे. याच कारणामुळे बांगलादेशविरुद्धची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. दोन देशांमधील अव्वल दर्जाच्या फिरकीपटूंमधील द्वंद्व याप्रसंगी पाहायला मिळणार आहे.
भारत आणि बांगलादेश लढतीला नेहमी एक वेगळी किनार असते. त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, बांगलादेश संघाने २००७ च्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले होते. बांगलादेशचा संघ आजही या विजयाची प्रेरणा घेऊन मैदानात उतरतो. दुसरी गोष्ट म्हणजे खेळात सातत्य दिसत नसले, तरी बांगलादेशी खेळाडू नेहमी आपणच सर्वोत्तम अशा थाटात मैदानात उतरतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.