
गोवा: उत्तर गोव्यातील कांदोळी आणि वाळपई अशा दोन ठिकाणी वाढलेल्या बेवारस वाहनानांना त्वरित हटवावे असा आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही क्षेत्रांमध्ये एकूण ४९ बावरीस वाहने आढळून आली आहे आणि उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीत्ते यांच्या आदेशानुसार येत्या सहा महिन्यांच्या आत या वाहनांच्या मालकांनी त्यांचा दावा सदर करावा अन्यथा या वाहनांचा लिलाव केला जाईल अशी माहिती दिली आहे.
उत्तर गोव्यातील वाहतूक पोलिसांनी कांदोळी आणि वाळपई येथे आढळून आलेल्या बेवारस गाड्यांची यादी सादर केली होती, यामध्ये कांदोळीतील ४२ (१८ दुचाकी आणि २४ चारचाकी) तर वाळपईमधून ५ (१ मिनीबस आणि ४ चाकी) यांचा समावेश आढळून आला आहे.
या बेवारस गाड्यांमुळे स्थानिकांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतोय, एवढंच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या या वाहनांमुळे डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा बनली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीत्ते यांनी भारतीय पोलीस कायदा कलम २६ अंतर्गत वाळपई आणि कांदोळी येथील रहिवाशांसाठी आदेश जारी केला आहे. आदेश जारी केलेल्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत या सर्वांना बेवारस गाड्या हटवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. दिलेल्या वेळेत जर का या गाड्यांवर कोणीही मालकी दाखवली नाही तर या गाड्या सरकार जमा होतील आणि त्यांचा लिलाव केला जाईल आणि यानंतर कुणीही यावर दावा सांगू शकणार नाही. या गाड्यांच्या लिलावातून मिळणारे उत्पन्न सरकारजमा केले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.