'सत्तरी तालुक्यात व्याघ्र क्षेत्र नकोच'

सत्तरी भूमिपुत्र संघटना: वनमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या भूमिकेचे समर्थन
Tiger
TigerDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: आपण मंत्रिपदी असेपर्यंत व्याघ्र क्षेत्र करू देणार नाही, असे वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी जाहीर केल्याने आमच्या लढ्याला बळकटी मिळाल्याचा दावा करून त्यांच्या विधानाचे स्वागत करीत आहोत, असे सत्तरी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस यांनी मंगळवारी वाळपई वेळूस येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जमीन मालकी हक्क , अभयारण्य सीमा निश्‍चिती, उत्पन्न क्षेत्राबाहेर अभयारण्य करावे, व्याघ्र क्षेत्र नको, या मागणीसाठी गेली पाच वर्षे आमचे आंदोलन सुरू आहे,असेही ते म्हणाले.

Tiger
'जूनपर्यंत आयुष इस्पितळ होईल सुरू'

उपाध्यक्ष बातू गावडे, सदस्य शिवाजी झर्मेकर, वासू केरकर यांची उपस्थिती होती. वनविभागाने व्याघ्र क्षेत्राच्या सर्वेचे काम हाती घेतले होते. ते सर्वेक्षणाचे काम ग्रामस्थांनी रोखले,असेही गावस म्हणाले.

शिवाजी झर्मेकर म्हणाले, वनमंत्री अशीच ठाम भूमिका घेऊन जमीन मालकीविषयी न्याय देतील, हा विश्वास वाढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com