
रायगड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता.1) मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सकाळी दहा वाजल्यापासून इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांचा दोन ते तीन तास खोळंबा झाला.
महाराष्ट्र दिन व कामगार दिन आणि शनिवार - रविवार निमित्ताने मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात तसेच गोव्यात फिरण्यासाठी निघाले आहेत. पण, मुंबई गोवा महामार्गाच्या गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला. इंदापूर व माणगाव येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे जवळपास दोन ते तीन तास वाहन चालकांना व प्रवाशांना थांबावे लागले.
महामार्गावरुन जाणारे अनेक वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवतात. यामुळे इतर वाहनांना देखील अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक कोंडी अधिकच जाटील होते. अनेक वाहने एकमेकांना धडकली. यामुळे वाहनचालकांमध्ये वाद देखील झाला. याशिवाय रखडलेल्या रस्त्याचे काम यामुळे देखील वाहतूक कोंडीत भर पडली.
मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किमी या पहिल्या टप्प्याचे सुरु झालेले काम तब्बल 16 वर्षापासून रखडले आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद होतो. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. रखडलेल्या या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवासी आणि नागरिक करतायेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.