Manoj Parab: सत्तरी कुणाच्या बापाची नाही; मनोज परब यांचे टीकास्त्र

पदयात्रा पूर्ण करण्याचा निर्धार
Manoj Parab
Manoj ParabDainik Gomantak

Manoj Parab: सत्तरी तालुक्यात वाळपई, पर्ये मतदारसंघांत मिळून विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ने दहा हजार मते घेतली होती. त्यामुळे म्हादईसारखी समस्या निर्माण होते, त्यावेळी त्या लोकांना पाठिंबा देण्याची पक्षाची नैतिक जबाबदारी असते.

म्हणूनच ठाणे येथून पदयात्रा सुरू केली होती. पण याला राजकीय वळण देत काहींनी पदयात्रा रोखली. पण आम्ही मागे हटणार नाही. सत्तरी तालुका कुणाच्या बापाचा नाही, असे रोखठोक प्रतिपादन मनोज परब यांनी केले.

Manoj Parab
CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या भेटीला...

वाळपई येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीनंतर परब बोलत होते. ते म्हणाले, पदयात्रा काढण्यात पंचायतींचा काहीही संबंध नसतो. आज उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर आमच्या वकिलांनी बाजू मांडताना काही घटनांचा उल्लेख करून जजमेंट सादर केले.

त्यात रामलीला, कर्नाटक सरकार, मेनका गांधी अशा काही जजमेंटचा समावेश होता. हे आमचे आंदोलन नव्हे, तर जनजागृती कार्यक्रम आहे. पदयात्रा हा आमचा हक्क आहे, असेही ते म्हणाले.

प्रसंगी न्यायालयात धाव घेऊ

काहीही झाले तरी पदयात्रेच्या परवानगीचे पत्र हाती घेऊन पोलिसांच्या साक्षीने सत्तरीत 100 किलोमीटरची पदयात्रा काढणारच, असे परब म्हणाले. शासनाने परवानगी दिली नाही तरी प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली जाईल.

मागील एका प्रकरणात आमचा विजय होऊन सरकारला चपराक बसली होती. आता ही दुसरी चपराक सत्तरीच्या बाबांना बसणार आहे, असेही परब म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com