Mahadayi Water Dispute: आता लोकांनी पेटून उठण्याची वेळ आली

म्हादई वळविल्यास पाण्याचे मोठे संकट येईल. यासाठी येणारी पिढी आम्हाला कधीच क्षमा करणार नाही. त्यामुळे लोकांनी पेटून उठावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी केले.
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Water Dispute: म्हादई आमची आई असल्याचे विधान सरकारने केले होते. परंतु सरकारकडून या आईची विक्री करण्‍यात आली आहे. म्हादईचे पाणी वळविण्यास गोवा सरकारने सहकार्य केल्याचे खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

म्हादई वळविल्यास राज्यावर पाण्याचे मोठे संकट येईल. यासाठी येणारी पिढी आम्हाला कधीच क्षमा करणार नाही. त्यामुळे आता लोकांनी पेटून उठण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी केले.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिसोझा बोलत होते. यावेळी पक्षाचे नेते अविनाश भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते. डिसोझा म्‍हणाले की, कर्नाटकात विधानसभा निवडणूक होणार असून म्हादईचा वापर राजकारणासाठी करणे हे मुळात चुकीचे आहे.

लोकांनी निवडून दिल्यानंतर आमदार आणि नंतर ते मंत्री झाले आहेत. परंतु आज याच मंडळींनी लोकांना रस्त्यावर आणले आहे. म्हादईचे पाणी वळविल्यास भविष्यात परिस्थिती गंभीर होईल. त्यासाठी आताच प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे, असे डिसोझा म्हणाले.

Mahadayi Water Dispute
Mahadayi Water Dispute: गोवा बंद करण्याचे धारिष्ट विरोधकांमध्ये आहे काय?

मुख्‍यमंत्री सावंत खोटे बोलले : क्लाईड क्रास्टो

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हादईप्रश्‍‍नी खोटे बोलले आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी गोव्‍यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्‍हादईच्‍या सौद्याची कबुलीच दिली आहे.

मात्र गोवा सरकारने या प्रकरणी कोणताही थेट सहभाग नाकारला आहे आणि त्यांनी गोवा विधानसभेत एक ठराव देखील मंजूर केला आहे,

ज्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक सरकारी शिष्टमंडळ घेऊन शहा यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच म्हादईचे पाणी वळविण्यास कर्नाटकला दिलेली मंजुरी केंद्राला मागे घेण्यास सांगितले.

Mahadayi Water Dispute
Panjim Municipality: महापालिकेचा कारभार होणार स्थलांतरित

कर्नाटकची दादागिरी

पणजीत तीन दिवस पाणीपुरवठा नसल्याने शहर कोरडे पडले होते. परंतु म्हादई नदीचे पाणी वळविल्यास त्‍याचे गंभीर परिणाम राज्यातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.

तर, दुसरीकडे कर्नाटकचे शेजारील राज्यांसोबत चांगले संबंध नाहीत. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू या राज्‍यांसोबत त्यांचे वैर आहे. त्यामुळे म्हादईच्या लढ्यात लोकांची भूमिका निर्णायक असेल, असे अविनाश भोसले म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com