पेडणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जे काम केले, त्या कामाची नोंद आजही प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे, त्यानुसार मार्गक्रमण केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले गुण आत्मसात केल्यास निश्चितच जीवनात बदल घडवून क्रांती घडेल, असे प्रतिपादन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी देऊळवाडा-कोरगाव येथे केले.
देऊळवाडा शिवाजी चौक कोरगाव येथे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपसरपंच कल्पिता कलशावकर, पंच समिल भाटलेकर, तांबोसे- मोप- उगवे सरपंच सुबोध महाले, नामदेव गावडे, कमळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गुरू प्रभू, कृष्णा पालयेकर, देवानंद गावडे, कृष्णा गावडे , माजी सरपंच पंढरी आरोलकर, संतोष पालयेकर, कल्पेश कलशावकर आदी उपस्थित होते.
आर्लेकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मियांसह स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे प्रत्येकाने त्यांचे आदर्शवत गुण घेणे गरजेचे आहे.
प्रास्ताविक देवानंद गावडे यांनी केले. सूत्रसंचालन कृष्णा पालयेकर यांनी केले. कल्पिता कलशावकर यांनी आभार मानले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.