नोकरभरती संदर्भात काँग्रेसचा मुख्यमंत्री निवासावर ढोल ताशांच्या गजरात मोर्चा

काँग्रेस भवन येथून सुरू झालेला हा मोर्चा पणजीतील चर्च चौकाजवळ अडवण्यात आला.
Pramod Sawant Job Recruitment 

Pramod Sawant 

Job Recruitment 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: राज्यात सरकारी खात्यातील नोकरभरती घोटाळाप्रकरणी सर्व खात्यांमधील नोकरभरती रद्द करण्याच्या मागणीसाठी काल युवा काँग्रेसतर्फे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर ढोल ताशांच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस भवन येथून सुरू झालेला हा मोर्चा पणजीतील चर्च चौकाजवळ अडवण्यात आला. यावेळी पोलिस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रेटारेटी झाली व मोर्चा तेथेच अडवून ठेवण्यात आला.

<div class="paragraphs"><p>Pramod Sawant&nbsp;</p><p>Job Recruitment&nbsp;</p></div>
चोडण पुलाबाबतची सरकारी घोषणा फसवी: काँग्रेसचे ऍड. प्रभूगावकर यांचा दावा

या मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, प्रवक्ते अमरनाथ पणजीकर तसेच काँग्रेस नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. मोर्चा अडविल्यानंतर पत्रकारांसमोर बोलताना वरद म्हार्दोळकर म्हणाले, की सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर तसेच दक्षता खात्याकडे तक्रार दाखल केल्यावर त्याच दिवशी ही नोकरभरती स्थगित करण्यात आली व चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. हा नोकरभरती घोटाळा फक्त सार्वजनिक बांधकाम खात्यातच नव्हे, तर ज्या खात्यांमध्ये नोकरभरती प्रक्रिया सुरू आहे त्यामध्येही झालेला आहे. त्यामुळे सर्व नोकरभरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. नोकरभरती सुरू असलेल्या सर्व खात्यांना ही प्रक्रिया त्वरित थांबवावी अशी विनंती करण्यात आली आहे. जर ही प्रक्रिया सुरूच राहिल्यास राज्यातील तरुणांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात जाणार आहे.

सरकारी खात्यातील नोकऱ्या पात्र उमेदवारांना डावलून त्यांचा लिलाव लावून विकल्या जात आहेत. सर्व प्रक्रिया धाब्यावर बसवून या खात्यांचे मंत्री व अधिकारी हा नोकरभरती (Job Recruitment) घोटाळा करत आहेत. उत्तरपत्रिका बदलल्या जात आहेत तसेच मंत्र्यांच्या मर्जीतील व त्यांच्या कार्यालयात कामाला असलेल्‍यांना पात्र ठरविले जात आहेत. नोकऱ्यांसाठी (Jobs) उमेदवारांकडे लाखो रुपयांची मागणी केली जात आहे तसेच अनेकांकडून ही रक्कम घेतली गेली आहे. या घोटाळ्यांचा जाब विचारण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला आहे व तो विचारण्याचा लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. खात्यांतर्गत नोकरभरती प्रक्रिया रद्द करून राज्य कर्मचारी निवड आयोगातर्फे ही नोकरभरती केली जावी अशी मागणी करूनही त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने हा मोर्चा काढण्याची वेळ या सरकारने आणली, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Pramod Sawant&nbsp;</p><p>Job Recruitment&nbsp;</p></div>
भाजप अलोकतांत्रिक मार्गाने सरकार चालवतयं : दिगंबर कामत

सरकारकडे (Government) रोजगार मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे व त्यात घोटाळा करून तो हिरावून घेऊ शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी शिक्षणासाठी मेहनत घेतलेली असताना या सरकारने नोकऱ्या लिलावास काढून त्यांच्यावर अन्याय केला आहे. तरुण पिढी बेरोजगार होत आहे. त्यामुळे मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी भ्रष्ट प्रकारे नोकऱ्या विकत आहेत त्याची चौकशी करण्यात यावी. जे उमेदवार गुणवत्ता यादीत असताना या याद्या बदलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे तो दूर करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी केली.

पणजीत वाहतुकीची कोंडी

या मोर्चामुळे चर्च चौकाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. संध्याकाळी सरकारी कार्यालये सुटल्यानंतर आजूबाजूच्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी (Police) झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सुमारे अर्धा तास वाहनचालकांना या कोंडीत अडकून राहण्याची वेळ आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com