Water Shortage: गोवेकरांसाठी महत्वाची बातमी ! धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

पाणीटंचाईची शक्यता : पंचवाडीत 18, अंजुणेमध्ये 23 तर साळावलीत केवळ 37 टक्केच पाणी
Dam
Dam Dainik Gomantak
Published on
Updated on

Water Shortage यंदा वाढलेल्या उन्हाची तीव्रता आणि तापमानामुळे गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी पुरेल का? हा प्रश्न गंभीर बनत आहे.

पंचवाडी धरणात केवळ 18 टक्के तर अंजुणेत 23 टक्के पाणी उरले आहे. जर पाऊस वेळेत सुरू झाला नाही तर राज्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता आहे.

जलस्रोत खात्याच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या साळावली धरणामध्ये 2022 मध्ये आजअखेर 53 टक्के पाणी होते. यंदा ते केवळ 37.2 टक्के शिल्लक आहे.

Dam
स्वच्छतागृहाच्या बोर्डवर सुप्रसिद्ध चर्चचा फोटो; गोव्याच्या Manohar International Airport वरील प्रकाराने संतापाची लाट

आठ दिवसांपूर्वी या धरणात ४१.७३ टक्के पाणी होते. तर अंजुणे धरणामध्ये २०२२ मध्ये ३६ टक्के पाणी होते ते २०२३ म्हणजे आज रोजी केवळ २३ टक्के असून आठ दिवसांपूर्वी २५.९९ टक्के पाणी होते. हीच स्थिती इतर आमठाणे, पंचवाडी, चापोली आणि गावणे धरणांच्या बाबतीत आहे.

गेल्या काही वर्षांतला अनुभव पाहता पाऊस जूनच्या मध्यापर्यंत राज्यात दाखल होत नाही. ही परिस्थिती यंदा आल्यास राज्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल.

Dam
Transfer Of Agriculture Land: ...अन्यथा गोमंतकीयांना स्वतःसाठी इंचभर जमीन शिल्लक राहणार नाही- खलप

काटकसरीने पाणी वापरा

धरणातील पाणीसाठा कमी होत आहे, हे खरे असले तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. राज्याला आवश्यक असणारा पाणीसाठा आपल्याकडे उपलब्ध आहे.

पण नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. सध्याचा पाणीसाठा वाढवण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com