Goa Agriculture: राज्यातील शेती संकटात, शेतकरी चिंतेत; पावसाची प्रतिक्षा

आर्द्रतेत वाढ, कमाल पारा 32 अंशावर
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Goamnatk

राज्यात मागील महिन्याभरात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वरुण राजाच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. येत्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पिकांवर संकट ओढवणार आहे. भात शेतीला मोठा फटका बसू शकतो.

भात शेती पाणी नसल्याने ऐन पोषण घेण्याच्या दिवसात पीक कोमेजू लागल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. यंदा राज्यात जूनच्या मध्यात मॉन्सूनचे आगमन झाले.

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक रिकोर्डब्रेक पाऊस पडला परंतु ऑगस्ट महिन्यात केवळ १२ इंच पाऊस पडला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील अपेक्षे प्रमाणे पाऊस पडेल याची शाश्‍वती नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत ११० इंच पाऊस पडला आहे. सरासरी एवढा पाऊस पडला आहे.

Goa Agriculture
Tinted Glass In Goa ‘टिंटेड ग्लास’ प्रकरणी 35 हजार वाहनांना दंड

अन्य पीकही धोक्यात

भात पिकासोबतच काकडी, दोडकी, भाजीपाला, अळूमाडी, चिबूड तसेच इतर भाज्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नसल्याने तसेच तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने हे पीक धोक्यात आले आहे.

"राज्यात यंदा मान्सूनने उशिरा आगमन झाले, त्यामुळे पीक लावणी उशिरा झाली. त्यानंतर जुलै महिन्यात अतिरिक्त पाऊस पडला परंतु मागील महिन्यापासून पावसात निश्‍चितपणाने घट झाली आहे."

"हा पिकांच्या पोषणाचा काळ असल्याने या दिवसात योग्य पाऊस पडला नाही तर पिकात घट होऊ शकते. भातात चिंब अधिक धरू शकते. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस पडला नाही तर निश्‍चितपणे शेतीसाठी चिंतेची बाब ठरू शकते."

- नेव्हील आल्फोन्सो, कृषी संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com