Valpoi Gram Nyayalaya: आता गाव पातळीवरच न्याय मिळणार! वाळपईत सुरु झाले गोव्यातील पहिले ग्राम न्यायालय

Sattari Gram Nyayalaya: वाळपई नगरपालिका प्रशासक इमारतीमध्ये ग्राम न्यायालयाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले
Sattari Gram Nyayalaya: वाळपई नगरपालिका प्रशासक इमारतीमध्ये ग्राम न्यायालयाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले
Valpoi Sattari Village Court Inaugration|District Judge Irshad AghaDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi Sattari Mobile Village Court

वाळपई: अनेकदा सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनतेला वरिष्ठ न्यायालयात दाद मागणे कठीण होते. तसेच ग्रामीण भागातील गरीब जनतेसाठी मोठ्या प्रमाणात ते खर्चिकही असते. असे नागरिक न्याय मिळण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी गाव पातळीवरच त्यांना न्याय मिळावा, यासाठी ग्राम न्यायालयाची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश इर्शाद आगा यांनी केले.

वाळपई येथे जिल्हा व सत्र न्यायालय उत्तर गोवातर्फे गोव्याच्या पहिल्या ग्राम न्यायालयाच्या उद्‌घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वाळपई नगरपालिका प्रशासक इमारतीमध्ये ग्राम न्यायालयाच्या कार्यालयाचे शनिवार, २१ रोजी उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ग्राम न्यायालयाचे न्यायाधीश वसीम रिझवी, वाळपई ॲडव्होकेट फोरमचे अध्यक्ष ॲड. यशवंत गावस, ॲड. राजन सावईकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्राम न्यायालयाचे व ग्राम न्यायालय बसचे फित कापून उद्‌घाटन करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन अनुराधा आंद्राद्रे यांनी केले. न्यायाधीश वसीम रिझवी यांनी आभार मानले. यावेळी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शांताश्री सिनाई कुडचडकर, तसेच मोठ्या संख्येने वकिल, नागरिक, विद्यार्थी व इतरांची उपस्थिती होती.

लोकांच्या दारात पोहोचणार

वाळपई वकील फोरमचे अध्यक्ष ॲड. यशवंत गावस म्हणाले, ग्राम न्यायालय कायदा, २००८ हा भारताच्या ग्रामीण भागात न्यायव्यवस्थेत जलद आणि सुलभ प्रवेशासाठी ग्राम न्यायालय किंवा ग्राम न्यायालयांच्या स्थापनेसाठी लागू केलेला भारतीय संसदेचा कायदा आहे. ग्राम न्यायालयांचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या दारात जाऊन न्याय मिळवून देणे हा आहे.

Sattari Gram Nyayalaya: वाळपई नगरपालिका प्रशासक इमारतीमध्ये ग्राम न्यायालयाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले
Mulgao Fire Incident: मुळगावात आगीमुळे चार दुचाकींची राखरांगोळी! दारूच्या नशेत कृत्य केल्याचा दाट संशय

महिन्यातून दोनदा आयोजन

ग्राम न्यायालयाचे न्यायाधीश वसीम रिझवी म्हणाले, उत्तर गोव्यातील वाळपईत प्रथम न्यायालय स्थापन होत असल्याने अत्यंत आनंद होत आहे. या ग्राम न्यायालयाचा जास्तीत जास्त नागिरकांना फायदा होऊन खटले निकालात काढण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. हे ग्राम न्यायालय महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी भरविले जाणार आहे. तसेच ग्राम न्यायालय बस प्रत्येकाच्या गावात देऊन न्याय देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com