
पणजी: राज्यातील सर्वांत मोठ्या भंडारी समाजाला एका छत्राखाली आणण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या आणि विविध राजकीय पक्षांमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
त्यासाठी भंडारी समाजातील सर्वच लोकप्रतिनिधींचा येत्या १२ ऑक्टोबरला हरवळे येथील रुद्रेश्वर मंदिरात गौरव करण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबत रविवारी हरवळेत घेतलेल्या पत्रकार परिषदेला माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, महादेव नाईक, माजी आमदार किरण कांदोळकर, ‘आप’चे राज्य निमंत्रक अमित पालेकर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
राज्यात भंडारी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. प्रत्येक निवडणुकीत या समाजाचे मतदार महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. त्यामुळेच विविध पक्षांत कार्यरत असलेल्या भंडारी नेत्यांनी संघटित होत समाजाला एकसंघ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
१२ ऑक्टोबरचा कार्यक्रम हा भंडारी समाजातील लोकप्रतिनिधींच्या गौरवासाठी आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. समाजाच्या भल्यासाठीच आम्ही विविध पक्षांचे नेते एकत्र आलो आहोत. पुढील काळातही असे अनेक कार्यक्रम घेण्यात येतील. भंडारी समाज हा राज्यातील सर्वांत मोठा समाज असल्यामुळे अशा कार्यक्रमांचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीतही उमटू शकतात, असे अमित पालेकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.