
Goa Summer Updates
पणजी: राज्यात फेब्रुवारी अखेरीपासून मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असून नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील वाऱ्याच्या प्रवाहातील बदलांमुळे हा उष्मा जाणवत असून यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
यंदा राज्यात उष्म्याच्या झळा अधिकच लवकर जाणवायला सुरुवात झाली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ३७ अंशांवर पोहोचला, त्यामुळे नागरिक हैराण झाले. मार्चच्या सुरुवातीपासून उष्मा कायम असल्याने त्याचा तडाखा नागरिकांना बसला आहे.
किनारी भागात या उष्म्याचा प्रभाव अधिक जाणवत आहे. दुपारी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उष्म्याचा प्रभाव अधिक असतो. रात्री काही भागात थंडी तर किनारी भागात उष्मा जाणवतो; परंतु कमाल तापमानात काही प्रमाणात घट होते. नागरिकांनी या वाढत्या उष्म्यापासून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज राज्यात कमाल ३३.३ अंश सेल्सिअस तर किमान २४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली, जी सामान्य तापमानाच्या तुलनेत दोन अंशांनी अधिक आहे. पुढील दोन दिवस राज्यात तापमानाचा पारा कमाल ३६ व किमान २४ अंशादरम्यान राहणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.