

पणजी: गेल्या पाच वर्षांच्या काळात हेल्मेट परिधान न केलेल्या ६५२, तर दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या ६३ अशा एकूण ७१५ जणांना अपघातांत जीव गमावावा लागल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. २०२१ पासून आतापर्यंत हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालवताना किती चालकांचा जीव गेला? दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या किती जणांनी जीव गमावला? असे प्रश्न आलेमाव यांनी विचारले होते. त्
यावरील उत्तरातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जी आकडेवारी सादर केलेली आहे, त्यातून २०२१ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान न केलेल्या उत्तर गोव्यातील ३२९ आणि दक्षिण गोव्यातील ३२३ असे मिळून ६५२ जणांचा मृत्यू झाला.
वाहतूक पोलिस खात्यांत पोलिसांची कमतरता आहे का? असाही प्रश्न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारला होता. त्यावर वाहतूक पोलिस खात्यात सध्या ३७२ पोलिसांची कमतरता असल्याचे सांगत, कुठे किती पोलिस रिक्त आहेत? याची माहितीही सादर केलेली आहे.
वर्ष उत्तर गोवा दक्षिण गोवा
२०२१ १ ०
२०२२ ३१ १
२०२३ ६ ४
२०२४ १३ १
२०२५ ३ २
२०२६ ० १
(३१ जानेवारीपर्यंत)
एकूण ५४ ९
वर्ष उत्तर गोवा दक्षिण गोवा
२०२१ ५५ ५३
२०२२ ५० ७३
२०२३ ७५ ६९
२०२४ ६९ ६४
२०२५ ७२ ६०
२०२६ ८ ४
(३१ जानेवारीपर्यंत)
एकूण ३२९ ३२३
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.