
पणजी: राज्यातील भातशेती ही एक प्रमुख शेती आहे. रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात भातशेतीची लागवड करण्यात येते. फिशकरी-राईस हे गोमंतकीयांचे पारंपरिक जेवण आहे. त्यामुळे भातशेती हा येथील कृषी संस्कृतीचा घटक आहे.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात भातशेती होते. मागील पाच वर्षांतील भातशेती उत्पादनात वाढ झाली आहे; परंतु काही प्रमाणात लागवडीखालील क्षेत्रफळात घट झाली आहे. राज्यात २०१९-२० आर्थिक वर्षात ३४,६९८ हेक्टर क्षेत्रफळ भातशेती लागवडीखाली होते.
तर उत्पादन १,३५,५६१ टन एवढे होते. पंरतु २०२३-२४ आर्थिक वर्षात ३२,४७७ हेक्टर क्षेत्रफळ भातशेती लागवडीखाली होते. तर उत्पादन १४,२०५६ टन एवढे होते. २०१९-२० आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षातील क्षेत्रफळात २२२१ हेक्टर क्षेत्रफळाचा फरक जाणवतो रब्बी आणि खरीप हंगाम मिळून क्षेत्रफळात निश्चितपणे घट झाल्याचे समोर येते. याउलट या दोन्ही वर्षांच्या जरी क्षेत्रफळात घट झाली असली तरी ६४९५ टनाने भात लागवडीत वाढ झाली आहे.
२०१९-२० ३४,६९८ १,३५,५६१
२०२०-२१ ३२,६७७ १,३१,००९
२०२१-२२ ३२,३४७ १,३८,०७३
२०२२-२३ ३१,५१९ १,३२,५९४
२०२३-२४ ३२,४७७ १,४२,०५६
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.