Goa Congress: आणीबाणी ‘पोस्ट’वरून काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका

Goa politics: अकार्यक्षम सरकारने गोव्याला दिवाळखोरीत ढकलून आर्थिक आणीबाणी लादली; बीना नाईक
Goa politics: अकार्यक्षम सरकारने गोव्याला दिवाळखोरीत ढकलून आर्थिक आणीबाणी लादली; बीना नाईक
Womens Congress president Bina Naik criticizes Goa BJP government Dainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातील भ्रष्ट, अकार्यक्षम सरकारने गोव्याला दिवाळखोरीत ढकलून आर्थिक आणीबाणी लादली आहे. इंधन, भाजीपाला आणि कडधान्याच्या किमती वाढल्याने प्रत्येक घराचे बजेट कोलमडले आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महिला त्रस्त आहेत, असा सणसणीत टोला महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी हाणला आहे.

१९७५ मध्ये काँग्रेसच्या राजवटीत जाहीर झालेल्या आणीबाणीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस महिला अध्यक्ष बीना नाईक यांनी भाजप सरकारवर सामान्य लोकांप्रती आणि विशेषत: महिलांबाबत असंवेदनशीलतेचा आरोप केला.

उदरनिर्वाह चालवण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वसामान्यांबद्दल भाजप सरकारने पूर्ण असंवेदनशीलता दाखवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नेहमीच श्रीमंत समर्थक आणि गरीब विरोधी धोरण राबविले आहे.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज प्रत्येक गृहिणी महिलेला आर्थिक आणीबाणीचा सामना करावा लागत आहे, असा दावा बीना नाईक यांनी केला

डॉ. सावंत यांची खुर्ची देवाचा विश्वासघात करणाऱ्या आणि गोमंतकीयांची फसवणूक करणाऱ्या घातकी आणि पातकींच्या आधारावर टिकून आहे. डॉ. सावंतांनी राज्यघटनेची हत्या केली. मुख्यमंत्र्यांची खुर्ची बळकावण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सुरू केलेल्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पक्षांतरांना प्रोत्साहन दिले, असा आरोप काँग्रेस सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष दिव्या कुमार यांनी केला.

Goa politics: अकार्यक्षम सरकारने गोव्याला दिवाळखोरीत ढकलून आर्थिक आणीबाणी लादली; बीना नाईक
Amit Patkar Criticized BJP Government: 'भाजप सरकारची हिटलरला लाजवेल, अशी मुजोरशाही सुरु'; अमित पाटकर यांचा घणाघात

भाजपला सत्ताभ्रष्ट करण्यास आणीबाणी !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशिक्षितांसारखे वागणे थांबवावे आणि सोशल मीडियावर असंबद्ध मजकूर पोस्ट करणे बंद करावे. सतत वायफळ बोलून आणि खोट्या तारखा देऊन त्या पाळण्यास असमर्थ ठरलेले डॉ. सावंत आज हसण्याचा विषय बनले आहेत.

त्यांनी इतिहासाची पुस्तके वाचणे आणि स्वतःला शिक्षित करणे आवश्यक आहे, असेही दिव्या कुमार म्हणाले. गोव्यात रस्त्यांच्या वाईट पायाभूत सुविधांमुळे अपघात सुरक्षेची आणीबाणी आहे.

गोव्यात कायदा,सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीमुळे जीवन सुरक्षा आणीबाणी आहे. भ्रष्ट भाजप सरकारला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी आणीबाणी आहे, असे दिव्या कुमार म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com