Ferry Boat Services: चोडण-रायबंदर फेरीबोटीचा प्रश्न काही सुटेना, वारंवार नादुरूस्तपणाने प्रवाशांत संताप

फेरी धक्क्यावर सकाळ-संध्याकाळ वाहनांची मोठी कोंडी, धुक्यामुळे होतो परिणाम
Ferry Boat
Ferry BoatDainik Gomantak
Published on
Updated on

Chorao Ferry Boat: चोडण-रायबंदर जलमार्गावरील गेल्या काही दिवसांपासून पाचपैकी एक किंवा दोन फेरीबोटी नादुरुस्त होत आहेत. या समस्येमुळे सकाळी चोडण व संध्याकाळी रायबंदर धक्क्यावर प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने प्रवाशांना व वाहनचालकांना मोठाच मनस्ताप होत आहे.

चोडण-रायबंदर हा जलमाार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असून या मार्गावरील एक जरी फेरीबोट नादुरूस्त झाली तर वाहनांच्या व दुचाकींच्या मोठया रांगा दिसतात. गेल्या पंधरा दिवसात या मार्गावर एकतरी फेरीबोट नादुरूस्त होत आहे.

जुन्या फेरीबोटीबरोबरच दोन इंजिनच्या नव्या फेरिबोटी नादुरूस्त होत असल्याने प्रवाशांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. गेले पंधरा दिवस लोकांना सातत्याने मनस्ताप सोसावा लागत असूनही खाते, स्थानिक प्रनिनिधी यावर काहीच उपाय योजना करीत नसल्याने या मार्गावरील प्रवाशांत व वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षभरापासून चोडण ग्रामस्थांतर्फे या मार्गावरील फेरीबोटी व्यवस्था सुधारण्यासाठी खास ग्रामसभा घेण्याचा ठराव घेऊनही स्थानिक पंचायत यावर प्रतिसाद देत नाही. २० आॅगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात येईल,असे पंचायत मंडळाने सागितले होते. पण याची पूर्तता पंयाचतीने केलेली नाही.

गेल्या २३ फेब्रुवारी रोजी चोडण ग्रामसभेत चोडण ग्रामस्थांच्या वाहनांना खास पासेस द्यावेत, व त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे,फेरीबोट वाहतूक सुरळीत करावी व दोन्ही धक्क्यांवर वाहनांची मोठी कोंडी होते, ती येत्या १५ दिवसांत दूर करावी, अशा आशयाचा ठराव घेण्यात आला होता. त्यावर ग्रामसभेत उपस्थित आमदार प्रेमेंद्र शेट यांनी ठरावाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते.

मंगळवारी दि. २२ आॅगस्ट रोजी सकाळी काही प्रमाणात धुके पडल्याने सर्व फेरीबोटी रायबंदर धक्क्यावर गेल्या सकाळची ६ ची फेरीबोट न सुटल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली.

नंतर फेरीबोट आल्याने प्रवाशांनी सुस्कारा सोडला. धुक्यावर नियंत्रण ठेवून फेरीबोटी चालविण्यासाठी आधुनिक उपाययोजना आल्या आहेत, पण त्याचा उपयोग केला जात नाही.

Ferry Boat
Goa Fraud Case: क्षत्रिय मराठा समितीत कोटीचा घोटाळा! 'त्या' सात सभासदांकडून पै-पै वसूल करणार, कार्यकारिणीचा इशारा

ठराव नावालाच !

पंचायत सचिव गावस यांनी सांगितले,की हा ठराव अजूनही पाठवलेला नाही. यामुळे ग्रामसभेत घेतलेले ठराव सरकारी कार्यालयांत पाठवले जात नसल्याची प्रतिक्रिया गेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.

पुढील ग्रामसभेच्या आठवडाभर आधी हे ठराव पाठविण्यात येत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना गेल्या ग्रामसभेत आला होता.

Ferry Boat
Laxmikant Parsekar: नर्सिंग शिकणाऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘हरमल पंचक्रोशी’ मध्येही आता नर्सिंगला मिळणार प्रवेश

वेठीस धरण्याचा प्रकार!

नादुरूस्त फेरीबोटीमुळे चोडण व इतर मार्गावरील वाहनचालकाना एक ते दोन तास फेरीबोटीच्या प्रतीक्षेत राहावे लागते. खासगी कामगार, सरकारी, विद्यार्थी यांना याचा फटका बसतो.

काही रूग्णांनाही याचा फटका बसत असल्याचे दृष्य पहायला मिळते. या मार्गावरील अत्यावश्यक सेवेत सुधारणा व्हावी, अशी मागणी प्रवाशी व वाहनचालकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com