Goa Waterfall Ban : गोव्यातील सर्व धबधबे पर्यटनासाठी बंद राहणार; वनमंत्र्यांची घोषणा

धबधब्याच्या ठिकाणा जाणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल
Dudhsagar Falls
Dudhsagar FallsDainik Gomantak

Ban On Goa Waterfalls For Tourist : सर्व धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असून धबधब्याच्या ठिकाणा जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर गरमागरम चर्चा झाली.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी हा विषय काढत पाण्यात बुडून मरणाऱ्यांबद्दल वनखात्याला जबाबदार धरले. यावर वनमंत्र्यांनी सर्व धबधब्यांवर पर्यटनासाठी बंदी घातल्याचे सांगत वनखात्याकडून अहवाल मागविल्याचे सांगितले.

Dudhsagar Falls
गोव्यात बसून अमेरिकन नागरिकांना गंडा घालण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश; 9 संशयितांना अटक

यावर मुख्यमंत्री म्हणाले, सध्या पावसाळा सुरू असल्याने धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत. प्रवाहाला गतीही आहे. त्यामुळे साहजिकच धबधब्यांवर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

दुसरीकडे पाण्यात बुडून मारणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यातील अनेक घटनांमधील तरुण मद्य पिऊन पाण्यात उतरतात, असे निदर्शनास आले आहे. मद्य पिल्यानंतर त्यांना भान राहत नाही. परिणाम बुडून मरण्यात होतो. यासाठीच आम्ही यावर कायमची उपाययोजना करत आहोत.

कडक कारवाई करणार

राज्यातील सत्तरी, काणकोण, सांगे तालुक्यांमध्ये अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान आणि वनखात्याच्या जमिनीवर हे धबधबे आहेत. या धबधब्यांवर काही शुल्क आकारले जाते. मात्र खात्याकडे यासाठी आवश्यक असलेला प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नाही. याकरताच आम्ही दृष्टी या जीव रक्षकांच्या संघटनेशी बोलणी सुरू केली असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

सध्या हे सर्व धबधबे पर्यटनासाठी बंद आहेत. मात्र अशाही स्थितीत काहीजण धबधब्यांवर जात आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यापुढे या सर्व धबधब्यांवर दारूबंदी असेल, असेही मंत्री राणे म्हणाले.

Dudhsagar Falls
Goa Crime Branch : कासावलीत जुगार अड्ड्यावर छापा; 15 संशयितांना अटक

धोकादायक धबधबे

वनखात्याच्या कार्यक्षेत्रात येणारे काही धबधबे हे पर्यटनासाठी धोकादायक आहेत. यासाठीच खात्याला याबाबतचा अहवाल बनवण्यास सांगण्यात आला असून कोणते धबधबे पर्यटनासाठी धोकादायक आहेत?

कोणते धबधबे पर्यटनासाठी योग्य आहेत, याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक राजीव गुप्ता, मुख्य वन संरक्षक सौरभ कुमार यांना अहवाल बनवण्यास सांगितले असून तो अहवाल आल्यानंतर काही धबधबे पर्यटनासाठी कायमचे बंद करण्यात येतील, असे मंत्री राणे म्हणाले.

पर्यटनावर परिणामाची शक्यता

यंदा पाण्यात बुडून मरणाऱ्यांची संख्या वाढल्याने याचा पर्यटनावर परिणाम होऊ शकतो. वनमंत्री सध्या ‘हिंटरलँड वॉटर फॉल्स सर्किट’साठी आग्रही आहेत.

ते म्हणाले, सर्वच धबधब्यांचा सविस्तर अहवाल आल्यानंतर दृष्टी - जीवरक्षक संस्थेसारखे प्रशिक्षित जीवरक्षक नेमण्यात येतील. सुरक्षेसाठीच्या सर्व उपाययोजना करून हिंटरलँड पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येईल. तोपर्यंत राज्यातील सर्व धबधबे पर्यटनासाठी बंद राहतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com