डिचोलीत जोरदार पावसाचा पिकांवर परिणाम

लागवड धोक्यात : फळभाज्यांची बियाणे खराब, उत्पादनावर मर्यादा
Crop loss in Goa
Crop loss in Goaसंतोष गोवेकर

डिचोली : आठवड्यापूर्वी सलग पंधरा दिवस पडलेल्या ''कोसळ''धार पावसामुळे पावसाळी भाजी पिकावर परिणाम होण्याचे संकेत मिळत आहेत. संततधार पावसामुळे डिचोलीतील बहुतेक भागात भेंडी, दोडकी आदी फळभाज्यांची बियाणी कुजून गेली आहेत. उत्पादावरही मर्यादा आली आहेत. तसेच यंदा पावसाळी भाजी पीक धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. तशी भीतीही काही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Crop loss in Goa
Goa Zuari Car Accident : झुआरी कार दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

डिचोलीतील सारमानस, बागवाडा-पिळगाव, साळ, मेणकूरे, धुमासे, मये, नार्वे, कुडचिरे, कारापूर, लाडफे, बोर्डे आदी विविध ग्रामीण भागांत पावसाळ्यात पालेभाज्यांसह भेंडी, दोडकी, भोपळा आदी भाजी लागवड करण्यात येते.

यंदाही पाऊस सक्रिय होताच बहूतेक भागात पोरसू तयार करून भाज्यांची बियाणी रुजतही घातली होती. काही भागात बियाणी रुजून रोपही वर आले आहेत. मात्र ''कोसळधार पावसामुळे सारमानस, मये आदी काही भागांत भेंडी आदी भाज्यांची बियाणी रुजलीच नाहीत. कोसळधार पावसामुळे बियाणी रुजून वर आलीच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेल्यातच जमा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com