वाळपई, टीव्ही, इंटरनेट, मोबाइल आणि संगणकाच्या युगात जन्माला येणारी नवी पिढी आधीपेक्षा वेगळी आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि साहजिकच त्यांचे समस्या सोडवण्याचे मार्गही वेगळे आहेत,असे असे प्रतिपादन हरमल येथील पार्सेकर बीएड महाविद्यालयाचा मराठी विभाग प्रमुख सहा. प्रा. डॉ. गीता येरलेकर यांनी केले.
आजची मुलं ही उद्याचे भविष्य असून राष्ट्र निर्मितीसाठी पालकांनी मुलांना सुजाण पालकत्वाद्वारे घडवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
वाळपई वेळुस येथील श्री हनुमान विद्यालयात आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी शिक्षण संस्थेचे सल्लागार कांता पाटणेकर, अध्यक्ष नरहरी हळदणकर, मुख्याध्यापिका सुविधा बर्वे, व्यवस्थापक देवेश पेडणेकर, सचिव सदाशिव वेलिंगकर, गौरीश काणेकर, पीटीए अध्यक्षा साधना जोशी, शिक्षक विश्वास कवळेकर, गायत्री गावस तसेच इतरांची उपस्थिती होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.