
छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. संभाजी महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक युद्धे लढली, त्यापैकी गोव्यावरची मोहीम ही एक महत्त्वपूर्ण स्वारी होती. गोवा हा त्या काळात पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि तेथील वाढता प्रभाव रोखणं हे मराठ्यांसाठी आवश्यक होते.
पोर्तुगीज 1510 पासून गोव्यात सत्ता गाजवत होते. त्यांनी अनेक हिंदू मंदिरे पाडली आणि स्थानिक हिंदू जनतेवर धर्मांतरासाठी दबाव आणला होता. हिंदू व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना धार्मिक अडचणींचा सामना करावा लागत होता. पोर्तुगीजांनी हिंदू धर्मीयांवर अन्याय केला, यामुळे संभाजी महाराज गोव्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.
पोर्तुगीजांनी 16व्या शतकापासून गोव्यात हिंदू धर्मीयांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करून जबरदस्तीने ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. अनेक प्राचीन हिंदू मंदिरे नष्ट करून चर्च बांधली गेली. हिंदू विवाह, सण, परंपरा आणि पूजा विधींवर बंदी घालण्यात आली होती.
संभाजी महाराज ख्रिस्ती धर्म प्रचार आणि हिंदूंच्या होणाऱ्या छळाला विरोध करीत होते. त्यांनी गोव्यातील पोर्तुगीजांकडून घेतलेल्या हिंदू मंदिरांच्या उद्ध्वस्तीकडे आपलं लक्ष वेधलं. संभाजी महाराजांनी या अन्यायाला उत्तर देण्यासाठी आणि मराठा साम्राज्याचा प्रभाव पश्चिम किनाऱ्यावर प्रस्थापित करण्यासाठी नोव्हेंबर 1683 मध्ये गोव्यावर मोठ्या सैन्यासह आक्रमण केलं.
मराठ्यांनी गोव्याच्या वास्को, म्हापसा आणि इतर भागांवर जोरदार हल्ले केले. पोर्तुगीजांनी मुघल बादशाह औरंगजेबाची मदत मागितली, त्यामुळे मोठ्या संघर्षानंतर मराठ्यांना मागे हटावं लागलं. संभाजी महाराजांची गोवा स्वारी ही भूभाग मिळवण्यासाठी नव्हती, तर हिंदू धर्म आणि मराठा साम्राज्याच्या रक्षणासाठी होती. तरीही, महाराजांनी गोव्यावर दबाव कायम ठेवला आणि हिंदू जनतेवरील अत्याचार काही प्रमाणात कमी झाले.
संभाजी महाराजांची गोव्यावर स्वारी ही मराठा साम्राज्य विस्तार आणि पोर्तुगीजांच्या वाढत्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी होती. मात्र, मुघलांच्या हस्तक्षेपामुळं हा विजय मराठ्यांच्या हातून गेला. औरंगजेबाने सरदार मकर्रब खान आणि हाफिज सईद यांच्या नेतृत्वाखाली मोठं सैन्य पोर्तुगीजांच्या मदतीसाठी पाठवले.
गोवा हे पश्चिम किनाऱ्यावर एक संरक्षणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठिकाण होतं. मराठ्यांना सागरी सुरक्षा मजबूत करायची होती. कारण पोर्तुगीज, इंग्रज आणि डच यांचा सागरी मार्गांवर प्रभाव वाढत होता. गोव्यावर नियंत्रण मिळवलं असतं तर मराठ्यांना आपली आरमार (नौदल) क्षमता वाढवता आली असती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.