काँग्रेसने गोमंतकीयांची माफी मागावी: सी. टी. रवी

सी. टी. रवी : राज्यातील खाणी काँग्रेसनेच बंद पाडल्या
C. T .Ravi
C. T .RaviDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील खाण व्यवसाय काँग्रेसच्या काळात बंद झाला. त्यावेळी राज्यात दिगंबर कामत यांचे तर देशात मनमोहन सिंग यांचे सरकार होते. खाण व्यवसाय बंद होण्यास कारणीभूत असल्याचे कबूल करून काँग्रेसने गोमंतकीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केले.

C. T .Ravi
देवेंद्र फडणवी: अन्याय झाल्याचे सांगून मते मिळवण्यासाठी ची धडपड

येथील निवडणूक कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, खोटे बोल; पण रेटून बोल, ही काँग्रेसची परंपरा आहे. गेल्या साठ वर्षांत त्यांना जमले नाही ते भाजपने केवळ दहा वर्षांत करून दाखवले. भाजप जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्याचे रिपोर्ट कार्ड लोकांसमोर मांडले आहे. केलेल्या विकासकामांचे रिपोर्ट कार्ड लोकांसमोर आणणारा भाजप हा देशातील एकमेव पक्ष आहे.

C. T .Ravi
Goa Election: गोव्यात 'विशेष सोशल मीडिया नियंत्रण कक्ष' स्थापन

तुमची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पक्षाने डॉ. प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर राज्याची जबाबदारी टाकली. डॉ. सावंत यांनी अल्पावधीत अतिशय चांगले काम केले. महामारीच्या कठीण परिस्थितीतही त्यांनी कार्यकुशलता दाखवली. ही निवडणूक आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत. स्वाभाविकपणे आगामी काळात राज्याचे नेतृत्व तेच करतील.

केंद्र असो व राज्य सरकारच्या सर्व सामाजिक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य डॉ. सावंत यांच्या सरकारने केले आहे. यामुळे जनता आम्हाला प्रचंड मतांनी निवडून देईल, अशी खात्री रवी यांनी व्यक्त केली.

C. T .Ravi
'तो' व्हिडिओ बनावट! गोवा कॉंग्रेसचा दावा

...तर विरोधकांनी डोळे तपासावेत

‘आप’ आणि तृणमूल हे दोन्ही पक्ष भाजप द्वेष्टे आहेत. लोकांना आमिषे दाखवून न झेपणारी आश्वासने देत सुटले आहेत. विरोधकांनी विकास उघड्या डोळ्यांनी पाहावा, मगच बोलावे. तिसरा मांडवी पूल, झुआरी पूल, सरकारी इस्पितळांत अत्याधुनिक सोयीसुविधा, गोवा-मुंबई महामार्ग रुंदीकरण, आयआयटी हब, मोपा विमानतळ, किनारपट्टीवरील स्वच्छतागृहे अशी कैक कामे आम्ही केली. तरीही विरोधकांना ती दिसत नसतील त्यांनी डोळे तपासून घ्यावेत, असा टोला रवी यांनी हाणला.

राहुल गांधींची अभ्यासाविना टीका

रवी म्हणाले, राहुल गांधींना कोणत्याही विषयाचा अभ्यास नसतो. म्हणूनच ते भाजपवर टीका करण्यात धन्यता मानतात. राज्यातील खाण व्यवसाय त्यांच्याच काळात बंद पडला, हे ते सोयीस्करपणे विसरले आहेत. राज्यातील कोळसा हबविषयी राहुल यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रवी म्हणाले, आम्हालाही पर्यावरणाची जाण आहे. गेल्या दहा वर्षांत देशात आणि राज्यात आम्ही पर्यावरपूरक उद्योग उभारण्यास प्राधान्य दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com