Vegetables in Goa: राज्यात भाजीपाल्याची आवक वाढली

140 ते 160 रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे टॉमेटो आता 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.
Goa news
Goa news Dainik Gomantak
Published on
Updated on

मागील दोन महिने कडाडलेला टॉमेटोचा दर आता काही प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आला आहे. 140 ते 160 रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे टॉमेटो आता 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.

Goa news
Loksabha Election: श्रीपाद नाईक यांचा प्रचाराला आरंभ

कांद्या, बटाट्यांचा भावदेखील स्थिर आहे. राज्यात श्रावणात बहुतांशी कुटुंबीय संपूर्णपणे शाकाहारी आहार घेत असल्याने भाजीपाल्याची आवक वाढल्याचे विक्रेते सांगतात.

पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. मार्केटमध्ये पन्नास रुपयांना पालेभाजीच्या दोन जुड्या विकल्या जात आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. येत्या काळात भाजीपाल्याचे दर आणखी वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

श्रावणात राज्यातील बहुतांशी कुटुंबांत मांसाहार वर्ज्य असल्याकारणाने मासळी आणली जात नाही. त्यामुळे या काळात नीरफणस, भाजीची केळी यांना पसंती दिली जात असल्याने त्यांचा भाव वाढला आहे.

Goa news
Goa Road Condition: भाटलेतील रस्त्याची चाळण, दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष...

मध्यम आकाराचा नीरफणस १५० रुपयांना एक विकला जातोय, तर १० ते २० रुपयांना एक भाजीचे केळे विकले जात आहे.

रानभाज्यांना मागणी

पणजी मार्केटमध्ये टायखिळा, कुड्डूक, फांगला, कोंब, नीरफणस तसेच इतर रानभाज्या विक्रीसाठी येत असून त्यांना चांगली मागणी आहे. ग्रामीण भागात रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे भाजीचे दर वाढले तरी ग्रामीण भागात फारसा परिणाम झालेला नाही. सर्वत्र रानभाज्या मिळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com