Goa Government Job: सरकारी नोकरीची आस; पण उमेदवार चिंतेत!

Goa Government Job: 147 पदांसाठी 29 रोजी लेखी परीक्षा: 4 वर्षांपूर्वी अर्ज; पण वयोमर्यादेच्या अटीमुळे शंका
Goa Job Opportunities | Government Job
Goa Job Opportunities | Government JobDainik Gomantak

Goa Government Job: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीने जाहीर केलेल्या 147 पदांसाठी हजोरांच्या संख्येने अर्ज आलेले आहेत. हे सर्व उमेदवार 29 सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा देण्याच्या तयारीला लागले आहेत खरे. पण वयोमर्यादेच्या अटीमुळे त्यातील शेकडो उमेदवारांना सरकारी नोकरीचे स्वप्न तर भंगणार नाही ना,अशी शंका सतावत आहे.

Goa Job Opportunities | Government Job
Crime News: चिंबल मुरगन खूनप्रकरणी आरोप निश्‍चितीचा आदेश

या पदांसाठी चार वर्षांपूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. पण या ना त्या कारणाने या पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला विलंब होत गेला. सरकारी नियमाप्रमाणे 45 वर्षे ओलांडलेल्यांना सरकारी नोकरीत सामावून घेता येत नाही. त्यामुळे या पदांसाठी अर्ज केलेल्यांपैकी काही जणांचे 45 हून अधिक झालेले आहे.

ही वयोमर्यादा ओलांडलेल्या काहीनी आपल्याला वयोमर्यादेत सूट द्यावी, अशी अधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी अर्ज केला होता. तेव्हा त्यांनी वयोमर्यादा ओलांडलेली नव्हती. जर त्यांना सूट दिली नाही तर अनेकजण लेखी परीक्षेलाही बसणार नाहीत, असे कळते.

मात्र काही जणांनी 29 सप्टेंबरच्या लेखी परीक्षेला बसण्याचा निर्धार केलेला आहे. ज्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत, त्यात 15 स्टेनोग्राफर्स, 9 तलाठी, 92 कारकून व 31 मल्टी टास्किंग कर्मचाऱ्यांसाठीचा समावेश आहे. या संदर्भात या नोकरभरती प्रक्रियेशी संबंधित सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की वयोमर्यादेचा प्रश्र्न अर्जांची छाननी करताना किंवा लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उपस्थित होईल. आताच आपण काहीही वक्तव्य करू शकत नाही.

Goa Job Opportunities | Government Job
Goa Crime News: सांगे लैंगिक अत्‍याचार प्रकरण मडगाव सत्र न्‍यायालयात वर्ग

लेखी परीक्षेची चौथी खेप

अधिकाऱ्यांनी लेखी परीक्षा जाहीर करण्याची ही चौथी खेप आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले होते, त्यातील बरेचजण दुसऱ्या ठिकाणी नोकरीत आहेत. जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्याशी थेट फोनवरून किंवा ईमेलवरून संपर्क साधला तेव्हा हे उघड झाले. शनिवार व रविवार असे दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाने हजारो उमेदवारांशी संपर्क साधून लेखी परीक्षेची सूचना दिलेली आहे.

या नोकरभरतीसाठी पूर्वीच उशीर झाल्याने व यात उमेदवारांचा कसलाही दोष नसल्यामुळे जे कोण लेखी परीक्षेत उत्तिर्ण होतील किंवा जे नोकरीसाठी पात्र ठरतील, अशा वयाची ४५ वर्षे ओलांडलेल्यांना नोकरीस समावून घेणे योग्य ठरेल. जर असे केले नाही तर या उमेदवारांवर अन्याय केल्यासारखे होईल.

-क्लीओफात आल्मेदा कुतिन्हो,ज्येष्ठ वकील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com