Yashasvi Jaiswal: चालू सामन्यात दाखवला बाहेरचा रस्ता; अजिंक्य रहाणेच्या 'त्या' निर्णयामुळं यशस्वीनं सोडली मुंबई? WATCH VIDEO

Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane Controversy: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने एक धक्कादायक निर्णय घेत, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई ऐवजी आता गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane Controversy
Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने एक धक्कादायक निर्णय घेत, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई ऐवजी आता गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट वर्तुळात या निर्णयाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

यशस्वी जयस्वालने मुंबईसारख्या मजबूत संघातून बाहेर पडून गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. यशस्वीने असा निर्णय का घेतला? याबद्दल चर्चा सुरू असतानाच अजिंक्य रहाणेसोबत घडलेल्या एका घटनेमुळं त्यानं मुंबई क्रिकेट संघाला रामराम ठोकल्याचं म्हटलं जात आहे.

अजिंक्य रहाणे हा भारतीय क्रिकेट संघातील एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियापासून दूर आहे. मात्र, तो रणजी ट्रॉफी आणि इराणी करंडकात मुंबई संघाचे नेतृत्त्व करत आहेत. त्याचे युवा खेळाडूंना मार्गदर्शन फार महत्त्वाचे ठरते.

Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane Controversy
Goa Police: गोवा पोलिस खात्यात 1140 पदे रिक्त! 42 उपअधीक्षक, 215 उपनिरीक्षक, 442 कॉन्स्टेबल्सचा समावेश

संघाचे नेतृत्त्व करताना कर्णधाराला कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. अशाच एका प्रसंगात रहाणेला २०२२च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यात मोठा निर्णय घेतला. २०२२ मध्ये वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन असा सामना सुरू होता. अजिंक्य रहाणे वेस्ट झोन संघाते नेतृत्त्व करत होता.

या सामन्याच्या शेवटच्या दिवशी यशस्वी आणि साऊथ झोनचा फलंदाज रवी तेजा यांच्यात वाद झाला. पहिल्यांदा ५०व्या षटकात हा वाद झाला. पण रहाणे आणि पंचांनी मध्ये येत हा वाद शांत केला. मात्र ५७व्या षटकात पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला.

Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane Controversy
Abhay Deol: 'गोव्यातील सगळ्या गोष्टींनी मला खूप प्रेरणा दिली'! Goa Unseen अनावरणावेळी अभिनेता अभय देओलने व्यक्त केले प्रेम

दुसऱ्यांना वाद झाल्यानंतर कर्णधार रहाणेने एक मोठा निर्णय घेत, यशस्वीला मैदानाबाहेर पाठवलं. ६५व्या षटकात त्याला पुन्हा मैदानात बोलावण्यात आलं पण हा निर्णय क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. रहाणेच्या या निर्णयामुळे यशस्वीनं मुंबईसारख्या मजबूत संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com