
पणजी: सिनेक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने सातत्याने बदल घडत आहेत. ब्लॅक ॲण्ड व्हाईट, संगीत चित्रपटांपासून आताच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगातील सिनेमांचा मी साक्षीदार आहे. परंतु आता आम्ही अशा टप्प्यावर येऊन पोहोचलोय की, पुढील पाच वर्षांत सिनेमांत नेमके कोणते बदल घडतील हे देखील आम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे हे एक मोठे आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
चौदाव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात संवाद साधला असता आगाशे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजकाल तीन तासांच्या सिनेमांऐवजी दीड तासाचे सिनेमा तयार करायला सांगितले जात आहे. हेसुद्धा एक आव्हानच आहे, असे आगाशे म्हणाले.
गोवा हे एक छोटे राज्य आहे. तरीसुद्धा येथे सातत्याने गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून ही कौतुकास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्रातही असे महोत्सव होत नाहीत. गोव्यात मराठीप्रति जी आत्मीयता आहे, कलेप्रति जी भावना आहे ती इतरांमध्ये दिसत नाही. गोव्याची जनता ही कला उपासक असल्याचे डॉ. आगाशे यांनी सांगितले.
मी माझ्या आयुष्यात वैद्यकीय आणि अभिनयाच्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे, त्याची दखल घेऊन ‘कृतज्ञता सन्मान’ पुरस्कार दिल्याबद्दल मी आभारी आहे. आपल्या कामाची कोणीतरी दखल घेऊन सन्मानित करण्यात येते याबद्दल समाधान वाटले.
- डॉ. मोहन आगाशे,ज्येष्ठ अभिनेते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.