India-Iran: नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला एस जयशंकर राहणार उपस्थित

India-Iran Relationship: नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला एस जयशंकर राहणार उपस्थित
India-Iran Relationship: S Jaishankar will be present at the swearing-in ceremony of the new President
India-Iran Relationship: S Jaishankar will be present at the swearing-in ceremony of the new PresidentTwitter @DrSJaishankar
Published on
Updated on

अफगाणिस्तानमधील(Afghanistan) बदलत्या परिस्थितीमध्ये, परराष्ट्र मंत्री(Minister of External Affairs of India) एस जयशंकर(S. Jaishankar) 5 ऑगस्ट रोजी तेहरान(Tehran) येथे होणाऱ्या इराणचे(Iran) नवनिर्वाचित अध्यक्ष इब्राहिम रईसी(Ebrahim Raisi) यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे.भारत आणि इराणमधील बदलत्या संबंधांविषयी जाणकार व्यक्तीने सोमवारी ही माहिती दिली. रईसी हे इराणचे कट्टरपंथी नेते मानले जातात.ते सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे जवळचे आहेत. जूनमध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकली होती . भारताने या कार्यक्रमासाठी इराणचे आमंत्रण आधीच स्वीकारले आहे, या सोहळ्यासाठी अनेक देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

अमेरिकेच्या निर्बंधांमुळे गेल्या तीन वर्षांपासून इराणशी असलेल्या संबंधांबाबत उदासीन असलेला भारताचा दृष्टिकोन बदलू शकतो हे स्पष्ट आहे. तज्ञांच्या मते, भारत सरकार आपल्या तेल कंपन्यांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे.

India-Iran Relationship: S Jaishankar will be present at the swearing-in ceremony of the new President
अफगाणिस्तानातील परिस्थिती सहा महिन्यांत बदलेल: राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी

गेल्याच महिन्यात, परराष्ट्रमंत्र्यांनीआपल्या रशिया भेटीदरम्यान इराणची राजधानी तेहरान येथे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची भेट घेतली होती . अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी आणि त्याच्या धोरणात्मक हितसंबंधांना होणारा संभाव्य धोका पाहता बदलती परिस्थिती पाहता, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच त्यांचे इराणी समकक्ष जावाद जरीफ यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला होता.सध्याच्या वातावरणात अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे तीव्र हल्ले पाहता इराणची भूमिका महत्त्वाची बनली आहे. इराण केवळ तालिबानच्या एका मोठ्या गटाशी सतत संपर्कात नाही, तर अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात त्याच्या स्तरावर शांतता बैठका घेत आहे.त्यामुळे ही भेट महत्वाची भेट मानली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, तेहरानमध्ये परराष्ट्र मंत्री जावेद जरीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जयशंकर यांनी इराणमध्ये बांधल्या जाणाऱ्या चाबहार बंदराला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला होता. तालिबानची सत्ता येण्याची शक्यता पाहता, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की याचा भारताच्या चाबहार प्रकल्पाच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो.भारत हे बंदर अफगाणिस्तानच्या आतील भागात रेल्वे आणि रस्त्याने जोडण्याचे काम करत आहे. यासह, भारताने येथे विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्याची योजना आखली आहे. अफगाणिस्तानची अस्थिरता या गुंतवणूक योजनांवर परिणाम करू शकते, ज्याबद्दल इराणलाही चिंता आहे.

India-Iran Relationship: S Jaishankar will be present at the swearing-in ceremony of the new President
UNSC: सुरक्षा परिषद किती शक्तीशाली आहे; जाणून घ्या

आखाती प्रदेशात भारतासाठी इराण हा प्रमुख देश राहिला आहे. दोन्ही देश आग्नेय आशिया आणि मध्य आशिया यांच्यातील संपर्क सुधारण्यावर संयुक्तपणे भर देत आहेत.गेल्या महिन्यात ताशकंद येथे एका कनेक्टिव्हिटी कॉन्फरन्समध्ये जयशंकर यांनी इराणच्या चाबहार बंदराला प्रमुख प्रादेशिक ट्रान्झिट हब म्हणून प्रस्तावित केले होते. इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात असलेले चाबहार बंदर भारत, इराण आणि अफगाणिस्तानद्वारे कनेक्टिव्हिटी आणि व्यापारी संबंध वाढवण्यासाठी विकसित केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com