चारधाम यात्रेला हवामानाचा तडाखा, आतापर्यंत 41 प्रवाशांचा मृत्यू

आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना प्रवास न करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला
Char Dham Yatra
Char Dham YatraDainik Gomantak

उत्तराखंडमध्ये पाऊस (Uttarakhand Weather ) थांबल्यानंतर बद्रीनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने यात्रा थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता पुन्हा बद्रीनाथ यात्रा सुरू झाली आहे. (Char Dham Yatra 2022)

तर केदारनाथ जाणारा पायी प्रवासाचा मार्ग गौरीकुंड येथे विस्कळीत झाला आहे. काल रात्रीच्या पावसामुळे हा रस्ता खचला आहे. त्यामुळे गौरीकुंडमध्ये प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. चमोली येथे मुसळधार पाऊस, लांबागडमधील खचडा नाल्यात वाढलेले पाणी आणि बलदुडा येथे दरड कोसळल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील हनुमान चाटी ते बद्रीनाथ दरम्यान यात्रा थांबवण्यात आली. पांडुकेश्वर, बद्रीनाथ जोशीमठ, पिपळकोटी, चमोली, गौचर येथे प्रवाशांना थांबवण्यात आले.

Char Dham Yatra
Kedarnath Dham : 2 वर्षांनंतर केदारनाथमध्ये भक्तांची अलोट गर्दी

चार धाम यात्रेत आतापर्यंत 41 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे

दुसरीकडे चार धाम यात्रेत आतापर्यंत 41 भाविकांचा मृत्यू झाला आहे. केदारनाथ यात्रेदरम्यान सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यादरम्यान 15 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी यमुनोत्रीमध्ये 14, बद्रीनाथमध्ये 8 आणि गंगोत्रीमध्ये चार यात्रेकरूंचा मृत्यू झाला. उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार, डोंगर चढण्याचे आजार यामुळे भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, अशा प्रवाशांना, आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना प्रवास न करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

किती यात्रेकरूंनी भेट दिली

चार धाम यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होत आहे. स्थिती अशी आहे की केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये अनेक किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या आहेत. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथचे दरवाजे उघडल्यानंतर 8 मे ते 16 मे संध्याकाळपर्यंत 176463 यात्रेकरूंनी दर्शन घेतले आहे. त्याचवेळी, केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्याच्या तारखेपासून म्हणजेच 6 मे ते 16 मे पर्यंत 213640 यात्रेकरूंनी दर्शन घेतले आहे.

Char Dham Yatra
Kedarnath Yatra Tips: केदारनाथला जात असाल तर विसरूनही 'या' चुका करू नका

प्रचंड गर्दी पाहता पुन्हा एकदा चारधाम यात्रेतील प्रवाशांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण राहावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता दररोज 16000 भाविक बद्रीनाथला, केदारनाथमध्ये 13,000, गंगोत्रीमध्ये 8,000 आणि यमुनोत्रीमध्ये 5,000 भक्तांना रोज जाता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com