'हा आत्मविश्वास आहे, अहंकार नाही': एस जयशंकर यांनी राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे.
S Jaishankar & Rahul Gandhi
S Jaishankar & Rahul GandhiDainik Gomantak

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारत सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लंडनमध्ये झालेल्या 'आयडियाज फॉर इंडिया' परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता, जिथे त्यांनी भारतीय नोकरशहांवरही निशाणा साधला होता. (S Jaishankar has strongly responded to the comments by Rahul Gandhi in London against the Indian government)

दरम्यान, या कार्यक्रमात त्यांच्या संवादादरम्यान, राहुल गांधी म्हणाले होते की, ''अनेक युरोपियन नोकरशहांनी मला सांगितले की, भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी बदलले आहेत. विशेष म्हणजे ते गर्विष्ठ झाले आहेत. ते पुढे म्हणाले, “मी युरोपमधील काही अधिकाऱ्यांशी बोलत होतो.'' त्यांनी मला सांगितले की, 'भारतीय परराष्ट्र सेवा पूर्णपणे बदलली आहे. ते काहीही ऐकत नाहीत. ते अहंकारी आहेत.' अधिकाऱ्यांना कोणते आदेश मिळत आहेत, यावर कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही. ” भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आता जे काही करत आहेत ते चुकीचे आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही असे करु शकत नाही.

S Jaishankar & Rahul Gandhi
'खुलासा' न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी चित्रपटांमध्ये साकारली होती भूमिका

दुसरीकडे, राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, 'मोदी सरकारच्या अंतर्गत भारतीय अधिकारी दाखवत आहेत, तो अहंकार नसून आत्मविश्वास आहे. त्यांनी स्वीकारले की सेवा बदलली आहे, ते सरकारी आदेशांचे पालन करत आहेत.' युरोपियन अधिकाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे आंधळेपणाने इतरांशी संबंध ठेवत नाहीत. परराष्ट्र सेवेतील अधिकारी आपल्या बाजूने उभे राहून राष्ट्रहिताचे रक्षण करत असल्याचेही केंद्रीय मंत्री म्हणाले.

S Jaishankar & Rahul Gandhi
भाजपचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर प्रश्नी स्वच्छ भूमिका घेतली होती

“होय, भारतीय परराष्ट्र सेवा बदलली आहे. होय, ते शासनाच्या आदेशाचे पालन करतात. होय, ते इतरांच्या युक्तिवादांना विरोध करतात. म्हणून त्याला अहंकार म्हणता येणार नाही. त्याला आत्मविश्वास म्हणतात. आणि याला राष्ट्रीय हिताचे रक्षण म्हणतात,” एस जयशंकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप पोस्ट करत ट्विट केले.

दुसरीकडे, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाविरुद्धच्या निर्बंधांबाबत भारताच्या भूमिकेवर पश्चिमेकडील देश नाराज आहेत. युरोपीय देश आणि अमेरिकेच्या दबावानंतरही मोदी सरकारने रशियाशी आर्थिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. रशियाकडून तेल आयात करणे भारताने थांबवले नाही. भारताने देखील युएनमध्ये अनेकदा रशियाच्या विरोधात मतदान केले नाही, त्याऐवजी मतदानापासून दूर राहणे पसंत केले.

S Jaishankar & Rahul Gandhi
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये केली होती स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची घोषणा

तसेच, युरोपीय राष्ट्रे रशियाकडून गॅस आयात करत असताना, भारताने रशियाकडून तेल घेणे बंद करावे, अशी त्यांची इच्छा आहे. भारताने स्वतःचे राष्ट्रीय हित लक्षात घेऊन मागे हटले नसल्यामुळे, पाश्चिमात्य सरकारे भारत सरकारवर नाराज आहेत. त्यांच्यापैकी काहींनी राहुल गांधींना सांगितले की, 'भारतीय अधिकारी गर्विष्ठ झाले आहेत हे स्पष्ट आहे.'

याशिवाय, या मुद्द्यावर भारत सरकारचे समर्थन करण्याऐवजी राहुल गांधी परदेशी अधिकाऱ्यांचे समर्थन करत आहेत. युरोपीय लोक भारतीय अधिकार्‍यांवर का रागावतात हे सर्वांना माहीत आहे, परंतु तरीही राहुल गांधी म्हणाले की, 'भारतीय अधिकारी जे करत आहेत ते चुकीचे आहे आणि ते हे करु शकत नाहीत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com