''गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे...''; संदेशखळीचा उल्लेख करत PM मोदींनी इंडिया आघाडीवर साधला निशाणा

PM Narendra Modi In West Bengal: संदेशखळी प्रकरणावरुन भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण असताना पंतप्रधानांचा हा दौरा होत आहे.
PM Narendra Modi In West Bengal
PM Narendra Modi In West BengalDainik Gomantak

PM Narendra Modi In West Bengal: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. संदेशखळी प्रकरणावरुन भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण असताना पंतप्रधानांचा हा दौरा होत आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधी आघाडी 'इंडिया'वर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, संदेशखळी प्रकरणावर इंडिया आघाडीचे नेते गप्प आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण देश दु:खी आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांवर गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे डोळे, कान आणि तोंड बंद असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, टीएमसीने पश्चिम बंगालमध्ये अत्याचार आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''संपूर्ण देश आज बंगालची स्थिती पाहत आहे. माँ, माटी, मानुषचा ढोल पिटणाऱ्या टीएमसीने संदेशखळीतील लेकीबाळींबरोबर काय केले हे पाहून संपूर्ण देश दु:खी आणि संतप्त आहे.''

PM Narendra Modi In West Bengal
Sandeshkhali Case: TMC नेते शाहजहान शेख यांना अटक, महिलांवर अत्याचार, ईडीवरील हल्ला; संदेशखळीत आत्तापर्यंत काय घडलं?

ममता दीदी आणि टीएमसीच्या लोकांनी आरोपींना वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व काही केले, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी जोरदार प्रहार केला. संदेशखळीतील महिलांसाठी भाजपच्या लोकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. टीएमसीचा हा गुन्हेगार नेता जवळपास दोन महिने फरार होता. त्याला वाचवण्यासाठी ममता सरकारने सर्व काही केले. पंतप्रधानांनी तिथे उपस्थित लोकांना विचारले की, 'तुम्ही अशा टीएमसीला माफ कराल का?'

पंतप्रधान पुढे म्हणाले की, "माता-भगिनींसोबत जे घडले त्याचा बदला तुम्ही घेणार की नाही? बंगालची जनता ममता दीदींना जाब विचारत आहे. दीदी, तुमच्यासाठी बंगालच्या महिलांपेक्षा काही लोकांची मते महत्त्वाची झाली आहेत का?" पंतप्रधान पुढे असेही म्हणाले की, "इंडिया आघाडीचे नेते गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे संदेशखळीवर डोळे, कान आणि तोंड बंद ठेवून होते."

PM Narendra Modi In West Bengal
Sandeshkhali Case: 'शहाजहान शेखला तात्काळ अटक करा', कोलकाता उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले

पंतप्रधान मोदी शेवटी म्हणाले की, "भ्रष्ट कुटुंबातील सदस्यांना आणि तुष्टीकरण करणाऱ्यांना पाठिंबा देणे हे इंडिया आघाडीचे एकमेव काम उरले आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीने जुलूमशाहीचा नवा पायंडा घातला आहे. येथील प्राथमिक शिक्षकांच्या भरतीत टीएमसीने मोठा घोटाळा केला. पालिका भरतीत घोटाळा झाला. गरिबांना रेशन देण्यात घोटाळा झाला, हेच काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे सत्य आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com