

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार असून ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल. केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशन बोलाविण्यास मंजुरी दिली आहे.
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी आज ही माहिती दिली. या अधिवेशनात मतदारसंघ फेररचना विधेयकासह अन्य महत्त्वाची विधेयके मांडली जाऊ शकतात. सरकार आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर जोरदार खडाजंगी होऊ शकते. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पार पडत आहे.
हे मुद्दे गाजणार
नीट पेपरफुटीचे प्रकरण
परीक्षेतील गैरव्यवहार
महागाई, बेरोजगारी
राम मंदिरातील चोरी
मतदारयाद्यांची फेररचना
घाऊक पक्षांतर