Mann Ki Baat: "आता आम्ही दहशतवादाला चिरडत आहोत," मुंबई हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

PM Modi: आता मुलांमध्येही याबाबत उत्साह दिसून येत आहे. आजकाल मुलं कोणतीही वस्तू खरेदी करायला जातात तेव्हा ती वस्तू मेड इन इंडिया आहे की नाही हे तपासून पाहतात.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

"Now we are crushing terrorism," PM's tribute to Mumbai attack martyrs:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा 107 वा भाग आज प्रसारित करण्यात आला.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहीली.

मन की बात कार्यक्रमात पीएम मोदी म्हणाले की, "आज 26 नोव्हेंबर आहे आणि हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. या दिवशी देशातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडला होता. पण त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता पूर्ण धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत ही भारताची ताकद आहे. मुंबई हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो."

आज प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी मुंबई हल्ला, संविधान दिन, परदेशात विवाहाचा ट्रेंड आणि व्होकल फॉर लोकल या विषयांवर आपले मत व्यक्त केले.

संविधान दिन

पीएम मोदी म्हणाले की, आजचा दिवस आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा आहे. १९४९ मध्ये या दिवशी संविधान स्वीकारण्यात आले. 2015 साली संविधान दिन साजरा करण्याची कल्पना आपल्या मनात आली. त्यानंतर आम्ही प्रयत्न केले आणि तेव्हापासून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

PM Modi
पतीच्या मृत्यूनंतर पुनर्विवाह हा पत्नीचा वैयक्तिक निर्णय, त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही: हायकोर्ट

परदेशात लग्नाचा ट्रेंड

पीएम मोदी म्हणाले की, आजकाल एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. लोक परदेशात जाऊन लग्न करतात. हे करणे आवश्यक आहे का? भारतात लग्न केले तर भारताचा पैसा भारतातच राहील, असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे लोकांना आवाहन करून सांगितले की, शक्य असल्यास आपल्याच देशात लग्नाचे आयोजन करा. परदेशात जशी व्यवस्था इथे मिळत नाही, तशी व्यवस्था इथे मिळू शकते, पण इथे प्रयत्न केल्यास आम्ही इथे व्यवस्था करू.

PM Modi
PM Modi Security Breach: पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी ७ पोलीस अधिकारी निलंबित

व्होकल फॉर लोकल

आपल्या देशात व्होकल फॉर लोकलवर खूप भर दिला जातो. दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांवर लोकांनी ४ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे आपण पाहिले. यामध्ये वोकल फॉर लोकलने महत्त्वाची भूमिका बजावली.

आता मुलांमध्येही याबाबत उत्साह दिसून येत आहे. आजकाल मुलं कोणतीही वस्तू खरेदी करायला जातात तेव्हा ती वस्तू मेड इन इंडिया आहे की नाही हे तपासून पाहतात. ऑनलाइन वस्तू खरेदी करतानाही लोक मूळ देशाकडेच पाहतात. यामुळे आमच्या व्होकल फॉर लोकलला चालना मिळत आहे.

व्होकल फॉर लोकलचे यश विकसित भारत, समृद्ध भारताद्वारे अनलॉक केले जात आहे. यामुळे रोजगाराची हमी मिळते, विकासाची हमी मिळते आणि शहरी आणि ग्रामीण भागाला समान संधी मिळते. यासोबतच जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था ढासळली तरी व्होकल फॉर लोकल त्याचे संरक्षण करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com