आता तिकीट कन्फर्म ! 3 हजार गाड्या, 1 हजार कोटी प्रवासी आणि 5 हजार किमी ट्रॅक; वाचा काय आहे रेल्वे मंत्र्यांचा प्लॅन

Ashwini Vaishnav: येत्या काळात देशातील सर्व रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीट देण्याची योजना आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यामागचा पूर्ण प्लॅन उघड केला आहे.
Now all passengers will get confirmed tickets! Three thousand new trains will run in the country.
Now all passengers will get confirmed tickets! Three thousand new trains will run in the country.Dainik Gomantak
Published on
Updated on

Now all passengers will get confirmed tickets! Three thousand new trains will run in the country, Says Rail Minister Ashwini Vaishnav:

गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेमध्ये विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. अनेक किलोमीटरचे नवीन रेल्वे रुळ टाकण्यात आले. अनेक नवीन गाड्या सुरू झाल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेससारख्या जगप्रसिद्ध गाड्याही या काही वर्षांत रुळांवर धावल्या आहेत.

आता पुढील पाच वर्षांत आणखी हजारो गाड्या चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे. या योजनेनुसार पुढील पाच वर्षांत तीन हजारहून अधिक गाड्या चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे.

रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता ८०० कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यासाठी येत्या चार-पाच वर्षांत तीन हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहोत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली.

वैष्णव म्हणाले की, प्रवासाचा वेळ कमी करणे हे त्यांच्या मंत्रालयाचे आणखी एक महत्त्वाचे लक्ष्य आहे. वैष्णव म्हणाले, "सध्या वर्षाला सुमारे 800 कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. चार ते पाच वर्षांत ही क्षमता १००० कोटींपर्यंत वाढवावी लागेल कारण लोकसंख्या वाढत आहे."

Now all passengers will get confirmed tickets! Three thousand new trains will run in the country.
Manipur Violence: ''हिंसाचाराची चौकशी करा, अन्यथा…'', कुकी ग्रुपने दिला मोदी सरकारला 14 दिवसांचा अल्टिमेटम

ते पुढे म्हणाले, "यासाठी आम्हाला तीन हजार जादा गाड्यांची गरज आहे, ज्यामुळे प्रवाशांची ही वाढलेली संख्या सुलभ होण्यास मदत होईल."

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ६९ हजार नवे डबे उपलब्ध असून दरवर्षी रेल्वे सुमारे पाच हजार नवीन डबे बनवत आहे.

सूत्रांनी सांगितले की, या सर्व प्रयत्नांमुळे रेल्वे दरवर्षी 200 ते 250 नवीन गाड्या आणू शकते, जे 400 ते 450 वंदे भारत गाड्यांव्यतिरिक्त आहे. येत्या काही वर्षांत या गाड्या रेल्वेत सामील होणार आहेत.

वैष्णव म्हणाले की, प्रवासाचा वेळ कमी करणे हे रेल्वेचे आणखी एक लक्ष्य आहे, ज्यासाठी मंत्रालय ट्रेनचा वेग सुधारण्यासाठी आणि रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी काम करत आहे.

Now all passengers will get confirmed tickets! Three thousand new trains will run in the country.
News Click Case: न्यूजक्लिक प्रकरणात ED चे नेव्हिल रॉय सिंघमला समन्स; भारताविरुद्ध कट रचल्याचा...

वैष्णव म्हणाले की, रेल्वेची क्षमता आणखी वाढवण्यासाठी दरवर्षी सुमारे पाच हजार किलोमीटरचे ट्रॅक टाकले जात आहेत. एक हजाराहून अधिक उड्डाणपूल आणि अंडरपासही मंजूर झाले असून अनेक ठिकाणी काम सुरू झाले आहे.

गेल्या वर्षी, आम्ही 1,002 उड्डाणपूल आणि अंडरपास बांधले आणि यावर्षी ही संख्या 1,200 पर्यंत वाढवण्याचे आमचे ध्येय आहे, असे रेल्वे मंत्र्यांनी पुढे नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com