Mukesh Ambani Birthday Special: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल जाणून घ्या 'या' खास गोष्टी

6 जुलै 2002 रोजी धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची सूत्रे हाती घेतली.
Mukesh Ambani Birthday
Mukesh Ambani BirthdayDainik Gomantak

Mukesh Ambani Birthday Special: देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा आज 66 वा वाढदिवस साजर करत आहे. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी भारताबाहेर येमेनमध्ये झाला. 

आशियातील सर्वात श्रीमंत आणि जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत 13 व्या स्थानावर विराजमान असलेला मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूह सतत नवनवीन यश प्राप्त करत आहे.

RIL चे मार्केट कॅप सध्या 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यानुसार जगातील सर्वात मौल्यवान 50 कंपन्यांमध्ये तिचा समावेश आहे. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा कारभार हाती घेतली आणि यशाच्या शिखरावर नेले. आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यावसायिक प्रवासाबद्दल जाणुन घेउया.

  • आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

अलिकडेच 2023 ची अब्जाधीशांची यादी जाहीर केली होती आणि मुकेश अंबानी यांना आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जागा देण्यात आली.

फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी $84.1 अब्ज च्या संपत्तीसह जगातील सर्वोच्च अब्जाधीशांच्या यादीत 13 व्या स्थानावर आहेत. 

गेल्या वर्षीपर्यंत अंबानींचा या यादीत टॉप-10 मध्ये समावेश होता. मुकेश अंबानींचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप रंजक राहिला आहे. जिथून त्यांचे वडील दिवंगत धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज सोडली होती, तेथून अंबानींनी तिला अशा टप्प्यावर नेले.

Mukesh Ambani Birthday
उत्तर भारतात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी

अभ्यासाला मधेच फुलस्टॉप देउन बिझनेस सांभाळला

त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशही घेतला, पण अभ्यास मध्येच सोडून त्यांनी वडिलांसोबत व्यवसाय शेअर करण्यास सुरुवात केली. 

मुकेश अंबानी यांनी 1981 मध्ये वडील धीरूभाई अंबानी यांच्यासोबत रिलायन्स ग्रुपमध्ये एंट्री केली. यानंतर, 1985 मध्ये कंपनीचे नाव रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड वरून बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यात आले. 

आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून चालत मुकेश अंबानी यांनी पेट्रोलियमशिवाय दूरसंचार क्षेत्रातही आपली पावले टाकली आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडची स्थापना केली. 

  • वडिलांच्या मृत्यूनंतर कारभार हाती घेतला


6 जुलै 2002 रोजी धीरूभाई अंबानींच्या मृत्यूनंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज ची कमान हाती घेतली. पण वडिलांच्या निधनानंतर त्यांचा आणि धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू झाला.

हा वाद वाटणी करण्यापर्यंत पोहोचला. अंबानी कुटुंबातील विभाजनाचा भाग म्हणून, रिलायन्स इन्फोकॉम धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्याकडे, तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुकेश अंबानी यांच्याकडे गेली. 

Mukesh Ambani and Dhirubhai Ambani
Mukesh Ambani and Dhirubhai AmbaniDainik Gomantak

जेव्हा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची सूत्रे हाती घेतली तेव्हा 2002 मध्ये तिचे बाजार भांडवल फक्त 75,000 कोटी रुपये होते. यानंतर मुकेश अंबानींनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने रिलायन्स इंडस्ट्रीजला देशातील सर्वात मोठी कंपनी बनवली. 

गेल्या वर्षी 2022 मध्ये, रिलायन्स 19 लाख कोटी एमकॅपसह देशातील पहिली कंपनी बनली. जरी, तेव्हापासून त्याचे बाजार मूल्य घसरले आहे, परंतु तरीही ते सध्या 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या क्षमतेच्या बळावर रिलायन्सला मोठ्या उंचीवर नेले, तर त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कॅपिटल आता विकण्याच्या मार्गावर आहे. 

Mukesh Ambani
Mukesh AmbaniDainik Gomantak
  • मुकेश अंबानींना प्रत्येक क्षेत्रात यश

रिलायन्स इंडस्ट्रीजची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी केवळ पेट्रोलियमच नाही तर रिटेल, लाइफ सायन्स, लॉजिस्टिक, टेलिकॉम आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रातही दमदार खेळी केली.

 त्यांची रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वात मोठी किरकोळ व्यवसाय कंपनी आहे आणि तिचा पोर्टफोलिओ सतत विस्तारत आहे. याशिवाय 2016 मध्ये अंबानींनी लाँच केलेली रिलायन्स जिओ या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आली. 

  • जिओच्या बळावर रिलायन्स कर्जमुक्त

मुकेश अंबानींच्या समजुतीमुळे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL LTD) ने अवघ्या 58 दिवसांत Jio प्लॅटफॉर्मच्या एक चतुर्थांशपेक्षा कमी विक्री करून 1.15 लाख कोटी रुपये उभे केले आणि राईट इश्यूद्वारे 52,124.20 कोटी रुपये उभे केले.

यामुळे कंपनी वेळेच्या नऊ महिने आधीच पूर्णपणे कर्जमुक्त झाली. 31 मार्च 2020 अखेर रिलायन्सवर 1,61,035 कोटी रुपयांचे कर्ज होते आणि कंपनीने 31 मार्च 2021 पर्यंत परतफेड करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

मुकेश अंबानींनी नऊ महिन्यांपूर्वी कर्जमुक्त केले आणि त्यात जिओने महत्त्वाची भूमिका बजावली. 

Mukesh Ambani and Nita Ambani
Mukesh Ambani and Nita AmbaniDainik Gomantak
  • व्यवसायात सक्रिय असलेली तिन्ही मुले

रिलायन्स समूहाचा झपाट्याने विस्तार होत असून आता मुकेश अंबानी यांनी आपल्या तीन मुलांवर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी रिलायन्स जिओचे नेतृत्व करत आहे तर त्यांची जुळी बहीण आणि मुकेश-नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी रिलायन्स रिटेलला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी एकामागून एक करार करताना दिसत आहे. अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत अंबानी समूहाच्या न्यू एनर्जीचा प्रभारी आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com