

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने हा सामना एकतर्फी जिंकला आणि भारताचा पाच विकेट्सनी पराभव केला. यासह, यजमान संघाने टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
टीम इंडियाने दिलेल्या १२६ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शानदार सुरुवात केली आणि केवळ १३ व्या षटकातच लक्ष्य गाठण्यात यश मिळवले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
त्यानंतर कांगारूंना पहिला धक्का बसला जेव्हा मार्श ४६ (२६) धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ ट्रॅव्हिस हेडने २८ (१५) धावा केल्या. जोश इंगलिस २० (२०) धावांवर बाद झाला. टिम डेव्हिड १ धावांवर बाद झाला.
त्यानंतर, १३ व्या षटकात, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सलग दोन चेंडूत दोन बळी घेतले, मिशेल ओवेनला १४ आणि मॅथ्यू शॉर्टला शून्य धावांवर बाद केले. तथापि, शेवटी, मार्कस स्टोइनिसने ६ चेंडूत ६ धावा काढून १३.२ षटकांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने निराशाजनक फलंदाजी केली. फक्त दोन फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले. अभिषेक शर्मा ६८ धावांवर बाद झाला, तर हर्षित राणा ३५ धावांवर बाद झाला. या दोन फलंदाजांमुळेच संघाने १२५ धावा केल्या.
पॉवरप्लेमध्ये भारताने चार विकेट गमावून फक्त ४० धावा केल्या होत्या. अशाप्रकारे, भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.