Election Commission PC: '64.2 कोटी लोकांनी मतदान केले, वर्ल्ड रेकॉर्ड झाला'; निकालापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

Election Commission PC: मतदान संपल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित घेत असल्याचे कदाचित पहिल्यांदाच घडत आहे.
Election Commission PC
Election Commission PCDainik Gomantak

Election Commission Press Conference: लोकसभा निवडणुक निकालाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले की, आपण वोटिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 64.2 कोटी लोकांनी मतदान केले. असे जगात कुठेही झालेले नाही. हे सर्व G7 देशांच्या मतदारांच्या 1.5 पट आणि 27 EU देशांच्या मतदारांच्या 2.5 पट आहे. यंदाची लोकसभा निवडणुक सात टप्प्यांत पार पडली. 19 एप्रिलपासून निवडणुकीला सुरुवात झाली आणि 1 जून रोजी संपली. मतदान संपल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करत असल्याचे कदाचित पहिल्यांदाच घडत आहे.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रमात सेवा देणाऱ्यांचे आयोगाने यावेळी कौतुक केले. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, ‘’कोणत्याही महिलेबद्दल चुकीची माहिती दिली जाऊ नये यासाठी आम्ही संपूर्ण निवडणुकीत सर्वतोपरी प्रयत्न केले... परंतु जिथे चुकीचे घडले तिथे आम्ही कडक सूचना दिल्या... यावेळी जम्मूमध्ये भरघोस मतदान झाले. विशेष म्हणजे, काश्मीर खोऱ्यात 51.05 टक्के मतदान झाले. आता जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आम्ही निवडणुका घेऊ. आम्ही सर्व्हे करायला गेलो तेव्हा यासंबंधी विचारण्यात आले होते. आज उत्तर देतोय.’’

Election Commission PC
Election Commission: 'विकसित भारत'चे मेसेज व्हॉट्सॲपवर पाठवणे तात्काळ थांबवा; निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश

कुमार पुढे म्हणाले की, ‘’ निवडणुक काळात आम्ही मनी पॉवरला आळा घातला... पैसे, मोफत वीज, दारु आणि इतर वस्तू वाटपाची कोणतीही मोठी घटना घडली नाही. प्रशासन यासंबंधी अगदी सतर्क होते. 4391 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. असे कोणी नाही ज्याचे हेलिकॉप्टर तपासले गेले नाही मग ते केंद्रीय मंत्री असो किंवा कोणत्याही पक्षाचे अध्यक्ष... आचारसंहिता भंगाच्या 495 तक्रारींचे निराकरण करण्यात आले.’’

Election Commission PC
Election Commission: निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींसाठी ॲडव्हायजरी जारी; PM मोदींविरोधात भाषणबाजी पडली महागात

मतमोजणीपूर्वी पत्रकार परिषद

दरम्यान, 4 जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एक दिवस आधी निवडणूक आयोग आज दुपारी 12.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. देशाच्या निवडणूक इतिहासात निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या शेवटी पत्रकार परिषद घेण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकार

सत्ताधारी भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएला 352 जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 2019 चा रेकॉर्ड मोडला जाईल असेही सांगण्यात येत आहे. 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान भाजपचा सत्तेत परतण्याचा एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला, तर जवाहरलाल नेहरुंनंतर सलग तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com