

१६ नोव्हेंबर रोजी एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये भारत अ आणि पाकिस्तान अ संघांमध्ये एक महत्त्वाचा सामना झाला. एका वादग्रस्त कॅचने जोरदार चर्चा सुरू केली. सामन्यानंतर काही तासांनंतरही, कॅचची चर्चा सुरू आहे.
नेहल वढेरा आणि नमन धीर यांनी संयुक्तपणे कॅच घेतल्यानंतरही पंचांनी त्याला नॉट आउट का घोषित केले हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. आयसीसीच्या बदललेल्या नियमामुळे पाकिस्तानी फलंदाज बचावला.
पाकिस्तानच्या डावाच्या १० व्या षटकात, जेव्हा मेजर सदाकत फलंदाजी करत होते, तेव्हा त्याने सुयश शर्माच्या गोलंदाजीवर एक मोठा शॉट मारला. नेहल वधेराने सीमारेषेवर चेंडू पकडला आणि दुसऱ्या बाजूला फेकला, जो नंतर नमन धीरने पकडला.
तरीही पंचांनी त्याला नॉट आउट घोषित केले. आयसीसीच्या नवीन नियमानुसार, कॅच घेताना दोन्ही क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर असले पाहिजेत, जे या कॅच दरम्यान नव्हते.
रिले कॅच संदर्भात महत्त्वाचा नियम स्पष्ट करताना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) अलीकडेच आपली भूमिका मांडली आहे. या नियमांनुसार, जर एखाद्या क्षेत्ररक्षकाने चेंडू सीमारेषेजवळ पकडल्यानंतर तो उडत असताना दुसऱ्या खेळाडूकडे पास केला, तर पहिला खेळाडू झेल घेण्याच्या प्रक्रिये दरम्यान सीमारेषेच्या आत असणे आवश्यक आहे. जर तो खेळाडू सीमारेषेबाहेर राहिला, तर असा झेल वैध मानला जाणार नाही.
ताज्या सामन्यात पंजाब किंग्जचा युवा फलंदाज नेहल वधेरा याच्या बाबतीत हा नियम चर्चेत आला. मैदानावर घेतलेल्या एका रिले कॅचमध्ये पहिला खेळाडू सीमाबाहेर राहिल्याने तिसऱ्या पंचांनी फलंदाज नॉट आउट ठरवला. कॅच योग्यरीत्या पूर्ण झाल्याचे भारतीय खेळाडूंचे मत होते; मात्र नियमांनुसार त्यास मान्यता मिळू शकली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.