काहीही न करता तुम्ही होऊ शकता श्रीमंत! फक्त 'या' टीप्स करा फॉलो

आपल्यालाही या युगात झटपट यश प्राप्त करायचे असले तर त्यासाठी आपण 20-30 वर्षे वाट पाहू शकत नाही.
Money
Money Dainik Gomantak
Published on
Updated on

सौंदर्य, भव्यता आणि समृद्धी जी आपल्याला आकर्षित करते, ज्याचे यशही आपल्याला आश्चर्यचकित करणारे वाटते. ते स्थान, भव्यता किंवा समृद्धी एका रात्रीत प्राप्त होत नाही तर त्यासाठी आहोरात्र कष्ट करावे लागतात. मग त्यानंतर आपण पाहिलेले उचित स्थान प्राप्त होते. मात्र ही भव्यता प्राप्त करण्यासाठी वेळ तर घ्यावाच लागतो. भारतातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले भारत झुनझुनवाला (Bharat Jhunjhunwala) किंवा वॉरेन बफे (Warren Buffett) जगातील सर्वोच्च श्रीमंतांपैकी एक. मात्र ते ही एका दिवसात इतके श्रीमंत झाले नाहीत. ही उंची गाठण्यासाठी त्यांच्या मागे वर्षानुवर्षाचे अथक परिश्रम आहे. आणि असेही नाही की, जर त्यांनी यशाची शिडी चढण्यास सुरुवात केली, तर ते फक्त चढत राहिले. त्यांना या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी अनेक चढ -उतारांचा सामना करावा लागला. जर ते आज यशस्वी व्यक्ती असतील, तर ते नंतर आपल्या स्थानावरुनही खालीही येऊ शकतात. आजच्या युगाकडे आपण डिजिटल युग म्हणून पाहतो. तुम्हालाही या युगात झटपट यश प्राप्त करायचे असले तर त्यासाठी आपण 20-30 वर्षे वाट पाहू शकत नाही.

होय, आम्हाला माहित आहे की, केवळ आपली गुंतवणूकच आपल्याला जीवनात अपेक्षित यश किंवा समाधान देऊ शकते, परंतु त्यासाठी आपल्याला त्वरित गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक पैसा, शिक्षण, आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा आणि आपल्या संयमामध्ये असू शकते. म्हणून जर तुम्हाला काहीही न करता श्रीमंत व्हायचे असेल तर किमान तुम्हाला लगेच गुंतवणूक सुरु करावी लागेल.

Money
डिजिटल पेमेंट चुकीच्या खात्यात? पहा RBI च्या गाइडलाइन्स

प्रथम गुंतवणूक करा

आपल्याला साधारणत:हा बाजारातील अस्थिरतेची भीती वाटते, त्यामुळे गुंतवणुक करण्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाही. परंतु असे नाही की, आपण गुंतवणूक करतच नाही. परंतु ज्यावेळी आपण गुंतवणूक करतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे आधी गुंतवणूक सुरु करणे आणि नंतर इतर गोष्टींचा विचार करणे चांगले होईल. खरं तर, पैसे कमवण्याचे मार्ग खूप सोपे आहेत, परंतु या पद्धती जितक्या सुसंगत असतील तितके अधिक पैसे सहजतेने येतात.

Money
आता देशात कुठूनही इंटरनेट शिवाय करा डिजिटल पेमेंट; RBI आणणार नवी योजना

गुंतवा आणि विसरुन जा

गुंतवणूकीसाठी आपल्याला खर्च नियंत्रित करण्याच्या तंत्रावर काम करावे लागेल. योग्य वेळेत गुंतवणूक करावी आणि ते विसरुन जावे (buy right, sit tight’ to ‘fill it, shut it, forget it). फक्त हा नियम पाळा आणि काहीही करु नका. असे काहीही करु नका आणि श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करा.

आता तुम्हाला वाटेल की, अशी व्यक्ती सुद्धा श्रीमंत बनू शकते. जर असे असते तर जगातील सर्व लोक श्रीमंत झाले नसते, आणि जर ते हे करत नसतील तर जग वेडे आहे. गुंतवलेले पैसे नेहमीच का वाढत राहतील, बाजारात कोणतेही चढ -उतार नाहीत तर असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.

Money
आता देशात BhartaPeची पहिली डिजिटल बँक, RBI ने दिली मंजुरी

दीर्घकालीन गुंतवणूकीत कमाई

हे खरे आहे की, बाजारात अस्थिरता कायम असते, परंतु ती अस्थिरता थोड्या काळासाठी असते. जर तुम्ही गुंतवणूक करुन विसरलेल्या युक्तीवर काम केले तर नक्कीच दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला फक्त आणि फक्त कमाई देईल. आपण पूर्वीचे कोणतेही रेकॉर्ड पाहू शकता.

25 वर्षे काहीही न केल्यावरही हा मंत्र तुम्हाला खूप श्रीमंत करु शकतो. नक्कीच, आपण प्रथम गुंतवणूक केली पाहिजे. नियमितपणे श्रीमंत होण्याचा कोणताही मार्ग नाही.

आणि असे नाही की, या काळात तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुमचा गुंतवणुकीचा प्रवास रोलर-कोस्टरसारखा असू शकतो, कधी वर जातो तर कधी खाली. बाजूला आणि मागच्या लूप आणि हुप्समध्ये तुमच्या पैशाचे मूल्य आहे. यामध्ये नशिबासारखे काहीच नाही. जेव्हा बाजार वाढतो तेव्हा गुंतवणूकदार पैसे कमवतात.

Money
आता RBI आणणार डिजिटल करन्सी

गमावण्यासाठी तयार रहा

Fear of Missing Out म्हणजे गमावण्याची भीती आणि सामूहिक लोभ बाजाराला अशा पातळीवर घेऊन जाऊ शकते जिथे तुमच्या आजूबाजूचे प्रत्येकजण पैसे कमवत आहे. आणि ज्या गोष्टीपेक्षा आपण तिरस्कार करतो ती म्हणजे पैसे गमावणे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवाच्या आणि सल्लागारांच्या मदतीने बाजारात 5-10% ची घसरण नियंत्रित करू शकता. परंतु आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की बाजार दर काही वर्षांनी 20 टक्क्यांपेक्षा जास्त घसरतो. आपण यासाठी तयार असले पाहिजे.

गमावता म्हणून घाबरु नका

ज्या व्यक्तीने बाजारातील डाउनट्रेंडचा हा टप्पा पाहिला आहे, त्यांना पैसे गमावण्याची भीती नसेत. परंतु भीती पाहिली तर प्रत्यक्षात या परिस्थितीत तोटा आणखी वाढू लागतो. म्हणूनच, यशस्वी गुंतवणूकदारासाठी अशा परिस्थितीत सामान्य राहणे फार महत्वाचे आहे.

बाजारातील मोठ्या मंदीच्या वेळी वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी देखील खूप महत्वाचे असते. हे असे क्षण असतात, जे तुमच्या प्रतिक्रियेच्या आधारे ठरवले जाते की, तुमचा परतावा काय असेल. आपल्याला फक्त येथे संयम दाखवावा लागतो. आपली संपत्ती कमी झाल्याचे पाहून बरेच लोक घाबरतील, तर काही शांत राहतील. जीवनाच्या सर्व क्षेत्रात, जेव्हा आपल्या सभोवतालच्या गोष्टी गडद दिसू लागतात, तेव्हा आपला मेंदू प्रतिक्रिया देतो की, जणू काही हा प्रलयाचा दिवस आहे आणि सर्व काही संपणार आहे. आणि आपण आपला अनुभव, ज्ञान अशा योजनेवरील विश्वास गमावण्यासा भागही पाडू शकतात. अशा परिस्थितीत हृदय आणि मन मजबूत करण्याची गरज असते. घाबरु नका, उलट या परिस्थितीतून कसे बाहेर पडावे याचा विचार करावा. अनुभवी गुंतवणूकदार अधिक शिस्तबद्ध होण्यासाठी सल्लागारांची मदत घेतात हे उचित आहे.

Money
अरे वा! आता इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट; वापरा या सोप्या पद्धती

बाजाराचा काही विचार करु नका

बाजारातील अस्थिरतेचा सामना करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्याबद्दल विसरणे. रोज बाजार बघू नका, मनातला गोंधळ शांत करा. आणि एक प्रकारे, स्वतःला लॉकर बंद ठेवल्यासारखे करा. जे बाहेर काय घडत आहे हे माहित नाही अस वाटू द्या. असे केल्याने बाजारात राहण्याची आणि पैसे कमवण्याची शक्यता सुधारु शकते. तंत्रज्ञान क्रांती ही वरदान आणि शाप दोन्ही आहे. जिथे ती आपल्याला क्षणोक्षणी माहिती देत असल्याने ती आपल्याला शांत बसू देत नाही. हे देखील खरे आहे की, पैसे कमवणे सोपे नाही, त्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी मजबूत मानसिक कौशल्ये आवश्यक असते. परंतु सर्वप्रथम, यासाठी तुम्हाला गुंतवणूक सुरु करावी लागेल. लवकर गुंतवणूक करणे तुम्हाला आयुष्यातील सर्वात मौल्यवान मालमत्ता, वेळ देऊ शकते. हे सर्व यशस्वी गुंतवणूकदारांचे वैशिष्ट्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com